शिक्षक संघटन प्रबळ करण्याची गरज – सुभाष मोरे
अकोले येथे शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*

*शिक्षक संघटन प्रबळ करण्याची गरज – सुभाष मोरे*
*अकोले येथे शिक्षक भारतीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न*
राहुरी तालुका जावेद शेख
शासनाच्या उदासीन धोरणांमुळे अनेक अन्यायकारक शासन निर्णय निर्गमित होत आहे व विरोधी पक्ष देखील शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करताना दिसत असल्याने यापुढे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संघटन प्रबळ करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य तथा शिक्षक भारती महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी केले अकोले तालुक्यातील पदाधिकारी व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शिक्षक भारतीची नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक अकोले ते संपन्न झाली आमदार कपिल पाटील विधानसभेत अनेक ज्वलंत प्रश्न उपस्थित करून ते सोडवले जायचे परंतु सद्यस्थितीत संच मान्यता शासन निर्णय अद्यापही मागे घेण्यात आलेला नाही, टप्पा अनुदान मिळालेले नाही,विविध पेन्शन योजनेचा सावळा गोंधळ, डी.सी.पी.एस., एन.पी.एस. असे अनेक पेन्शन प्रकार शासनाने आणल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे इतर विभागांना २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू झाली परंतु शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनाच जुनी पेन्शन योजना अद्याप लागू झाली नाही, अतिरिक्त शिक्षकांचा पगार बंद केला, ६ हजार शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहे, मागील वर्षाचे थकीत वेतन देयके, सी.एच.बी., अर्धवेळ मान्यता,४ वर्षापासून वेतन अद्यापही दिलेले नाही असे अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहे त्यामुळे आगामी काळात शिक्षकांना संघटन प्रबळ करण्याची गरज आहे अन्यथा अनेक संकटांना सामोरे जावे लागेल.
सदर बैठकीत पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर, जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे, कोषाध्यक्ष माध्यमिक विभाग सोमनाथ बोनंतले, माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, कार्याध्यक्ष गणपत धुमाळ, दत्तात्रय घुले, प्रवीण मालुंजकर, विजय पांडे,बळीराम फरगडे,वाघमारे,संतोष वाकचौरे, संदीप महाडदेव,विकास आवारी,सुरेश वाकचौरे, आनंद चौधरी आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.