कोणीही आडवे आले तरी भक्तीचा मार्ग सोडू नका – – हभप तुषार महाराज
कोणीही आडवे आले तरी भक्तीचा मार्ग सोडू नका – –
हभप तुषार महाराज
प्रतिनिधी :- पंकज पाटील
वरवट बकाल :- सुखात आणि आनंदात कोणीही कामात पडतो मात्र दुःखामध्ये कोणीही कामांमध्ये पहल नाही दुःखामध्ये कामात पडतो तो फल परमार्थ एखाद्या घरातील व्यक्ती हरिपाठ भक्ती मार्गात लागला असेल तर त्या कुळाचा पूर्ण उद्धार होतो त्यामुळे कुणी आडवे येऊ द्याहरिपाठ भक्तीचा मार्ग सोडू नका असे आव्हान हभप तुषार महाराज पाटील यांनी आयोजित वरवट बकाल येथील संगीतमय महाशिवपुराण आयोजित २ फेब्रुवारी रोजी कीर्तनाच्या कार्यक्रमामधून केले
एक गाऊ आम्ही विठोबाचे नामआनिकाचे काम नाही आता, मोहोनिया वाटा सुक्षम दुस्तर केला राज्यभार चाले आता हा जगगुरु तुकोबारायाचा अभंग तुषार महाराज पाटील यांनी कीर्तन सेवा साठी ठेवला होता या अभंगातून जगदुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही फारक्रएकनिष्ठेने विठोबाचे नामस्मरण करणार इतरांचे काहीही काम नाही कर्माच्या सूक्ष्म वाटा
आणि योगाच्या दुस्तर वाटा मोडून राजाचे चतुरंग सैन्य जेवढे बलाइध असते तेवढ़ा मोठा मार्ग आम्ही प्रस्थापित केला आता आम्ही मृदंग विना स्वरात लाडू आणि टाळाचा घोष करून ब्रहा रस आवडीने सेवन करू तुकाराम महाराज म्हणतात कोणी कितीही मोठा शत्रू असो त्याने हरी चे नाम मनोभावे घेतले तर त्याचे हित व तो जीवनमुक्त होतो,
ईश्वराची एक निष्ठेने भक्ती केल्यास त्याचे काय परिणाम पाहायला मिळतात हे तुषार महाराज यांनी कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात की जगगुरु तुकोबाराया यांनी
एकनिष्ठतेने विठोबाचे नामस्मरण भजन करतात. तेव्हा जगदुरु तुकोबारायाच्या पत्नीकडून विठोबाचा विरोध होत असतो. मात्र विठोबा रायाच्या भक्तीने विठोबा एवढे प्रसन झाले की तुकोबारायाच्या पत्नीच्या पायाला जेव्हा काटा रुतला तेव्हा साक्षात विठोबा यांनी तुकोबारायाच्या पत्नीच्या पायातील काटा काढला.
विठोबाची भक्ती तुकोबारायांनी केली फायदा मात्र विठोबाच्या पत्नीला झाला म्हणजे ईश्वराच्या भक्तीमुळे घरातील परिवारातील लोकांचा फायदा होत
असतो. एवढी भक्ती तुकोबारायाच्या एकनिष्ठ मे मुळे त्याच्या परिवाराला मिळाली
भक्त प्रल्हाद सुद्धा ईश्वराचे एकनिष्ठ भक्त होते भक्त प्रल्हाद ईश्वराची नारायण महादेवाची एवढी भक्ती करत या भक्तीमुळे स्वतःच्या बापाने भक्त भक्ताला प्रल्हादाला मारण्यासाठी होंगरावरून लोटून दिले गरम तेलाच्या गरम कढाईत लोटून आगीत सुद्धा घातले तरीसुद्धा ईश्वराच्या नामस्मरणाने भक्त प्रल्हाद ला कोणीही जिवंत मारू शकले नाही एवढी ताकद ईश्वराच्या नामस्मरणामुळे होती. म्हणून म्हणतो कोणीही आडवे येऊ द्या हरिपाठ भक्तीचा मार्ग सोडू नका असे आज्ञान ह भ म तुषार महाराज पाटील यांनी वारकरी आणिउपस्थित श्रुती यांना कीर्तन भजनाद्वारे मंत्र मुग्ध करून टाकले.
ह.भ.प धर्माचार्य गजानन महाराज दहिकर यांच्या अमृततुल्य ताणीतून सप्ताहभर सुरू असलेल्या संगीतमय महाशिवपुराण आयोजनासाठी गावकरी संत्त रुपलाल महाराज सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन चालू आहे