Breaking
ब्रेकिंग

मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे वेगळे का झाले? आणि आता एकत्र येतील का ?

0 3 9 0 2 6

मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे वेगळे का झाले? आणि आता एकत्र येतील का ?

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

मुंबई :-राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नात्यात गेल्या दोन दशकांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. एकमेकांच्या सोबत वाढलेल्या दोन भावांच्या वाटा आता बऱ्याच वेगळ्या झाल्या आहेत. राजकीय कटुता अनेकदा निवडणुकीच्या प्रचारात दिसून आली आहे. तरीही दोघा भावांनी एकत्र यावं अशीच महाराष्ट्र राज्य तील अनेकांची भावना आजसुद्धा आहे. पण हे शक्य आहे का? भूतकाळात त्यांचे संबंध नेमके कसे होते आणि भविष्यात काय?

 

बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक जुना फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोसारखेच राज ठाकरे, उद्धव ठाकरे पुन्हा एकाच फ्रेममध्ये यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. राज ठाकरेंनी टाळी दिली, उद्धव ठाकरेंना प्रतिसाद दिला आणि त्यांचे चंदूमामा वैद्य यांच्या पल्लवीत झाल्या.

*दोन दशकांपूर्वी दोघांच्या वाटा वेगळ्या*

राज आणि उद्धव दोघेही बालमोहन आणि जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी. दोघेही एकाच वेळी राजकारणात आले. राज ठाकरे बाळासाहेबांच्या जवळचे होते. त्यांच्यावर असलेली बाळासाहेबांची छाप प्रकर्षानं दिसून येते.

एकेकाळी मातोश्रीच्या अंगणात खेळलेल्या, बाळासाहेबांच्या सावलीत वाढलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या वाटा दोन दशकापूर्वी वेगळ्या झाल्या. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं नेतृत्त्व उद्धव ठाकरेंकडे आलं. त्यानंतर राज ठाकरेंनी आपली वेगळी वाट धरली. विठ्ठलाबद्दल तक्रार नाही मात्र भोवतीच्या बडव्यांबद्दल आहे असं म्हणत शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला.

*एकमेकांवर कडवट टीका*

राज ठाकरेंनी सवतासुभा मांडला. बाळासाहेबांनी ते मान्य केलं तरी, त्यांच्या सोडून जाण्याचं दुख बाळासाहेबांनी अनेकदा बोलून दाखवलं. पण राज आणि उद्धव ठाकरे कधी एकत्र येऊ शकले नाहीत. निवडणुकींच्या काळामध्ये दोघा भावांनी एकमेकांवर थेट वारही केले. प्रचाराची पातळी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या शेवटच्या काळातल्या जेवणापर्यंत जाऊन पोहोचली.

बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर 2014 आणि 2019 मध्ये त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा झाली. पण ते प्रत्यक्षात आकाराला आलं नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. 2024 च्या निवडणुकीतही राज ठाकरेंनी त्यांच्यावर कडवट टीका केली.

*कौटुंबिक सोहळ्यानिमित्त एकत्र*

राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी झालेल्या या ठाकरे बंधूंमधला कौटुंबिक जिव्हाळाही अनेक वेळा दिसून आला. 2012 मध्ये उद्धव ठाकरेंवर ऑपरेशन झाल्यानंतर राज ठाकरेंनी स्वत: कार चालवत लीलावती रुग्णालयातून त्यांना घरी नेलं होतं. गेल्या डिसेंबरपासून कौटुंबिक लग्नसोहळ्याच्या निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र आले होते.

*उद्धव-राज युतीमध्ये भाजप आडकाठी आणणार?*

सद्या राज्यात सुरु असलेले घाणेरडे राजकारण आणि कोण कुठल्या पक्षात जाईल तसेच तोडा फोडा आणि राज्य करा मधील राज्यात दोन ठाकरे एकत्र येणं किती गरजेचं आहे हे होण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना आता एकत्र यायचं असेल तर भाजपच त्यात आडकाठी आणेल, असं राजकीय जाणकारांना वाटतंय. कौटुंबिक सोहळ्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात तेव्हा, ते राजकारणातही एकत्र येण्याची चर्चा रंगते. आता इतक्या वर्षांनी 2025 मध्ये दोघा भावांनी एकमेकांना टाळी दिलीय. पण मागचं सगळं विसरून ते एकत्र येणार का हा प्रश्न आहे. जर दोघं ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्र राज्य मधील राजकारण कस फिरेल हे तो काळ च ठरवेल पण शेवट का होईना पण महाराष्ट्रा साठी दोघं भावांनी एकत्र यावं असं साऱ्यांना वाटत त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघं एकत्र निवडणूक लढवता का हे आता काळच ठरवेल.
जय महाराष्ट्र
जय शिवराय
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अमळनेर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे