जलजीवन मिशनमुळे रस्त्यांची लागली वाट
जलजीवन मिशनमुळे रस्त्यांची लागली वाट
नारायणडोहो प्रतिनिधी | रफिक शेख
हर घर जल अशी संकल्पना असलेल्या जलजीवन मिशन योजनेतून असंख्य नळपाणी योजना राबविली आहे. तालुक्यात तब्बल 121 नळपाणी योजनांची कामे जलजीवन मिशन मधून सुरु आहेत. त्या नळपाणी योजनांसाठी तालुक्यात प्रत्येक गावात रस्त्याच्या बाजूला जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदले आहेत. जलवाहिन्या टाकून अनेक महिने उलटले तरी रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्याचे आणि रस्त्यांची सुधारणा करण्याचे काम जलजीवन मिशन राबविणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना यांच्याकडून झालेले नाही. दरम्यान, गावोगावी रस्ते खोदलेली असल्याने सर्वत्र चांगले रस्ते मातीचे बनून गावातील रस्ते मातीमोल झाले आहेत.
नगर तालुक्यातील गाव जोडणाऱ्या आणि मुख्य रस्त्यांची महत्वाची कामे मागील तीन वर्षात वेगाने झाली आहेत. मात्र 2023 मध्ये नगर तालुक्यात जलजीवन मिशन आले आणि नगर तालुक्यातील रस्ते पूर्वीपेक्षा खराब बनविले गेले आहेत. तालुक्यातील बहुतेक सर्व गावात जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनांची कामे सुरु आहेत. तालुक्यातील 121 नळपाणी योजनांची कामे सुरु असून 200 हुन अधिक गावे आणि वस्ती वाड्यांमध्ये या नळपाणी योजना राबविल्या जात आहेत. जलजीवन मिशनमधील नळपाणी योजनांसाठी गावागावातील रस्ते जेसीबीच्या साह्याने खोदकाम करून त्या ठिकाणची रस्त्याची दुरावास्ता ठेकेदारांनी केली आहे. जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आणि त्यानांतर ते रस्ते पुन्हा दुरुस्त करून देण्याची जबाबदारी असताना देखील ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेच्या अधिकारी वर्गाच्या दुर्लक्षपणामुळे नगर तालुक्यातील रस्ते हे खोदून ठेवले होते ते आजही आहेत.
नगर तालुक्याच्या प्रत्येक गावात रस्त्यांची अशीच अवस्था असून जलवाहिन्या टाकण्यासाठी मुख्य रस्त्यांच्या बाजूने देखील खोदकाम केले आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याची मालकी असलेल्या रस्त्यावर कोणतीही परवानगी ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा किंवा जलजीवन मिशन कडून घेण्यात आलेली नाही. ग्रामीण भागातील रस्ते खोदल्यानंतर ते पुन्हा दुरूस्त करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. उपाभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग अहमदनगर यांचे या कामाकडे दुर्लक्ष आहे.रस्ते खोदायची आणि त्यात जलवाहिन्या टाकायच्या आणि नंतर माती टाकून रस्ते असेच ठेवून द्यायचे असे प्रकार तालुक्यात घडले आहेत. सिमेंट काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉक तसेच डांबरी रस्त्याची अशी अवस्था जलजीवन मिशन मधून जलवाहिन्या टाकताना झाली आहे. नगर तालुक्यातील नारायणडोहो रस्त्याचे खडिकरनाचे काम पूर्ण झाले असून पाईपलाईनच्या ठिकाणी रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना त्याचा त्रासदेखील होत आहे.जिल्हा परिषद उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग.कीर्तिकर गुरव
संपर्क केला असता प्रतिक्रिया देण्यास टाळा टाळ करीत आहे.