अमळनेर येथे पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची भव्य सुरुवातः डॉ. डिगंबर महाले यांचे अहम भाषण

अमळनेर येथे पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची भव्य सुरुवातः डॉ. डिगंबर महाले यांचे अहम भाषण
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर येथे पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची भव्य सुरुवातः डॉ. डिगंबर महाले यांचे अहम भाषण ! अमळनेर प्रतिनिधी पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनात उद्घाटनाच्या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. डिगंबर महाले यांनी अहिराणी भाषेबद्दल आपल्या विचारांची मांडणी केली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेत केली, जी आमच्या मायबोलीने सुरु झाला होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे.डॉ. महाले यांनी अहिराणी भाषेचा अभिमान व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. माझ्या या उद्घाटनाचे सन्मान प्राप्त करण्याबद्दल मी साहित्य मंडळाचे पदाधिकारी मनःपूर्वक आभार मानतो, असे ते भावनिकपणे म्हणाले, उद्घाटन दरम्यान त्यांनी अहिराणी भाषेत शिव्या आणि त्यांच्या सांस्कृतिक संदर्याबद्दल चर्चा केली. आधुनिक काळात पारंपरिक गाण्यात बदल अपेक्षित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले, काही गाणी इथून तिथे लंपट होत जातात, ज्यामुळे त्यांचा अस्सल अर्थ कमी होतो. कुटुंब लग्नातील परंपरा यावर डॉ. महाले यांनी विचार व्यक्त केले की, नवरदेवांचा वडीलांसह मान आदर देण्यात आला पाहिजे,परंतु शेतकऱ्यांचा संघर्ष आणि दैनंदिन जीवन यावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. त्यांनी उदा. दिला की, मोती पेरायचा म्हटले तरी शेतकन्यां च्या बियाण्याबाबदला होणाऱ्या आर्थिक संकटाचा विचार करायला हवा. त्यांच्या या विचारांमुळे उपस्थितांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या.संमेलनाच्या माध्यमातून अहिराणी भाषा आणि संस्कृतीच्या मान्यता तसेच संवर्धनाची महत्त्वता प्रगल्भकरण्याचे दृष्य डॉ. महाले यांनी व्यक्त केले. साहित्यिकांनी आणि रसिकांनी त्यांच्याशी सहमत होऊन, या अभिव्यक्तीस समर्थन दिले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव शामकांत देवरे, साहित्यिक रमेश सुर्यवंशी, सहाय्यक आयुक्त अर्चना राजपूत, मराठी वाडःमय मंडळाचे अध्यक्षडों अविनाश जोशी, आय ए एस अधिकारी राजेश पाटील, सानेगुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, डि. डि. पाटील, मा. जिल्हा परिषदेचे सदस्य सौ जयश्री पाटील, साहित्यिक कृष्णा पाटील, बाजार समितीचे अध्यक्ष आशोक पाटील डॉ बी. एस. पाटील, विचारपिठावर उपस्थित होते. प्रस्ताविक भगवान पाटील यांनी सांगितले की अहिराणी भाषेची गोडी चांगली आहे. ती भाषा आपल्या मुलांना शिकवली पाहिजे. अहिराणी भाषा कुठे कुठे बोलली जाते ते सांगितले. अहिराणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष भगवान पाटील, सचिव प्रभाकर शेळके, स्वागताध्यक्ष प्रा.डी. डी. पाटील, कार्याध्यक्ष प्रा. अशोक पवार, संयोजक प्रा. डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक रणजित शिंदे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, उपाध्यक्ष डी. ए. पाटील, साहित्यिक समन्वयक डॉ. कुणाल पवार, महिला समन्वयक वसुंधरा लांडगे, सचिव रामेश्वर भदाणेसह अहिराणी साहित्य संमेलनाचे संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन वसुंधरा लांडगे व शरद पाटील यांनी बहारदार अहिराणी भाषेत केले.