म्हैसगाव ग्रामपंचायत विकास कामे मार्गी लावल्याने जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकरांचा सत्कार सन्मान

म्हैसगाव ग्रामपंचायत विकास कामे मार्गी लावल्याने जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकरांचा सत्कार सन्मान
अहिल्यानगर / विशेष प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के
प्रशासनात कणखर शिस्तप्रिय अधिकारी असेल तर विकास कामाचा विकास वेग वाढत जातो. राहुरी तालुक्यातील म्हैसगावचे विविध विकास कामे काही तांत्रिक राजकीय विरोधी भूमिका मुळे रखडली होती. या कामातील उणीव दूर करून देखील संबंधित कामे चालू होण्याचे नाव घेत नसल्याने म्हैसगाव च्या महिला सरपंच सुजाता पवार ग्रामसेवक गावातील ग्रामस्थ सहकारी सोबत घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संबंधित कामाविषयी घटनाक्रम सांगितल्या नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ संबंधित अधिकारीची बैठक बोलावून संबंधित कामा विषयी शहानिशा करू सत्यता पडताळणी करून विनाकारण विकास कामे बंद पडलेली चालू करा जिल्हा परिषद अधिकारी यांनी दिलेल्या आदेश प्रमाणे म्हैसगावित अधिकारी दाखल झाले सर्व पाहणी करून संबंधित अडचणी दूर करून कामे सुरू झाली यात पशुवैद्यकीय रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय आणि वैद्यकीय निवास प्लॅन अंतर्गत ३ कोटी ६५ लाख रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी,७३ लाख लिटर पिण्याचे पाणी टाकी माजी खासदार डॉ सुजय विखे यांच्या निधीतून हे काम चालू आहे, केदारेश्वर देवस्थानाला सभामंडप २० लाख भूमीपूजन तसेच म्हैसेगाव आरोग्य केंद्रासाठी १७ लाख रुपये किमतीची ॲमब्युलन्स, १५ वित्त आयोग माध्यमातून ३ लाख रुपये पाणी पुरवठा पाईप लाईन ठाकरवाडी साठी सुरू आहे.सध्या म्हैसेगाव ग्रामपंचायतचे विकास कामाचे मुल्य ५ कोटी ९६ लाख रुपये आसपास आकडा गाठला आहे. असे विविध विकास वेगाने सुरू झाली काही कामे अंतिम टप्प्यात आली आहे. हि विकास कामे रखडली होती. या रखडली कामा संदर्भात जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिश येरेकर यांनी लक्ष दिल्याने हि काम पुर्णत्वास येत आहे. या बद्दल म्हैसगाव लोकनियुक्त सरपंच सुजाता अरुण पवार, व ग्रामसेविका शकीला पठाण,यांनी म्हैसेगाव ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी आशिश येरेकर यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार सन्मान केला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विकास कामाला अडचणी आल्या माझ्याशी संपर्क साधा असे आर्वजुन सर्व पदाधिकारी सांगितले प्रशासकीय अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर व आमचे अधिकारी तत्पर असतील असे आश्वसीत केले.