ओबीसी पदाधिकारी अभियानांतर्गत साधला शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्याशी संवाद
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने आगामी काळात काढण्यात येणाऱ्या ओबीसी जोडो यात्रेचे नियोजन

ओबीसी पदाधिकारी अभियानांतर्गत साधला शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्याशी संवाद
ओबीसी समाजातील संख्येने अतिशय अल्प असलेल्या जात घटकांपर्यत पोहोचून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे – कल्याण आखाडे
एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क
अहिल्यानगर : पदाधिकारी जोडण्यासाठी व एकजुटीने पुढे आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून ओबीसी पदाधिकारी संपर्क अभियान राज्यात सुरु आहे. राज्यातील लोकसंख्येच्या ५२ टक्के ओबीसी समाज असून, यामध्ये अनेक लहान-मोठ्या जातींचा समावेश आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या ओबीसी मधील जाती समुहाला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जात आहे. शहरात आमदार संग्राम जगताप देखील ओबीसी समाजाला बरोबर घेऊन त्यांच्या विकासासाठी योगदान देत असल्याची भावना राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रांत अध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या वतीने (अजित पवार गट) शहरात ओबीसी पदाधिकारी संपर्क अभियान व आगामी काळात काढण्यात येणाऱ्या ओबीसी जोडो यात्रेच्या (शहर व दक्षिण) नियोजनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत ओबीसी पदाधिकारी संवाद साधताना आखाडे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष अॅड. सचिन औटे, प्रदेश सरचिटणीस सौ.रेणुका पुंड, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डी. आर.शेंडगे, महानगर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, कार्याध्यक्ष तुषार टाक, महिला जिल्हाध्यक्षा सौ.आशाताई निंबाळकर, सामाजिक न्याय विभाग महानगर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्षा सौ.साधना बोरुडे, युवक जिल्हाध्यक्ष सागर गुंजाळ, अर्बन विभाग जिल्हाध्यक्ष प्रा.अरविंद शिंदे, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.रणजित सत्रे, व्यापार सेल जिल्हाध्यक्ष उमेश धोंडे यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी ओबीसी विभागाच्या ग्रामीण व महानगर कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या बैठकीला ग्रामीण व महानगर ओबीसी विभागाच्या पदाधिऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.