Breaking
ब्रेकिंग

ब्रँड अँबेसिडर श्री महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नशा मुक्त व सशक्त भारत अभियानास उस्फुर्त प्रतिसाद:- 550 विद्यार्थी व 16 शिक्षकांनी नोंदवला सहभाग

0 3 9 0 2 1

ब्रँड अँबेसिडर श्री महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली नशा मुक्त व सशक्त भारत अभियानास उस्फुर्त प्रतिसाद:- 550 विद्यार्थी व 16 शिक्षकांनी नोंदवला सहभाग

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. ३०/    वैराग येथे भारत सरकारच्या नशामुक्त भारत व सशक्त भारत अभियानांतर्गत वैराग (ता. बार्शी) येथील विविध शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यात आले. या उपक्रमास 550 विद्यार्थी तसेच 16 शिक्षकांनी सहभाग नोंदवत उस्फुर्त प्रतिसाद दिला. यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनाबरोबरच सामाजिक जीवनात व्यसनाधिनतेपासून कसे दूर राहावे तसेच शारीरिकदृष्ट्या कसे तंदुरुस्त रहावे याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. नशा मुक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान हे दोन्ही सामाजिक उपक्रम अतिशय उत्साहात ब्रँड अँबेसिडर श्री महेश वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग येथील नवीन मराठी प्राथमिक विद्यालय पंचशील नगर वैराग येथे संपन्न झाले.

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित उपक्रम नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर महेश वैद्य हे ग्रामीण भागातील विविध प्रायमरी स्कूल हायस्कूल कॉलेजेस येथे हे उपक्रम राबवितात त्याला उत्स्फूर्तपणे सर्वत्र प्रतिसाद मिळत आहे व अशा प्रकारच्या म्हणजेच नशा युक्त भारत अभियान आणि सशक्त भारत अभियान या दोन्ही सामाजिक उपक्रमाची समाजाला खूप गरज आहे असे मत ठिकठिकाणी व्यक्त केले जात आहे. त्यासाठी आपण पुढील आयुष्य या दोन्ही उपक्रमासाठी वेचणार आहे असे परखड मत महेश वैद्य आणि व्यक्त केले. मुले ही देवाघरची फुले असतात असे आपण म्हणतो त्या फुलांना पालकांनी तसेच शिक्षकांनी व्यवस्थित रित्या खत पाणी घालून म्हणजेच चांगले संस्कार करून त्यांना घडविले तर हे दोन्ही उपक्रम नशा मुक्त भारत अभियान व सशक्त भारत अभियान याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडतील असे प्रतिपादन महेश वैद्य यांनी केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात व्यसनापासून कसे दूर राहावे आणि त्याचे दुष्परिणाम याबद्दल वैद्य यांनी मार्गदर्शन केले आणि त्याचबरोबर बुद्धी आणि बल याची सांगड घातली तर जीवनात यशस्वी होता येते आणि कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते त्यासाठी दररोज अर्धा तास विद्यार्थ्यांनी व्यायाम करावा त्याने आपल्या शरीर सशक्त सुदृढ आणि निरोगी राहील.
त्याचप्रमाणे आहारामध्ये पिझ्झा बर्गर वडापाव इत्यादी पदार्थ घेणे टाळावेत त्याऐवजी दूध केळी चिकू सफरचंद पालेभाज्या भाकरी अशा प्रकारचे सकस आहार आपल्या आहारात असावेत त्याने चांगला परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो असेही सांगितले.

शालेय जीवनात मुलांनी दररोज अर्धा तास व्यायाम सकस आहार नित्यनियमित अभ्यास यावर लक्ष केंद्रित करावे आणि तंबाखू गुटखा सुपारी दारू अशा गोष्टीपासून खूप खूप दूर राहावे आणि अशा गोष्टी जे वडीलधारी मंडळी आणण्यास भाग पाडतील त्यांना स्पष्टपणे नकार द्यावा.
शाळेच्या विद्यार्थ्याना अतिशय उत्तम रित्या शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम कसा करायचा याबद्दल प्रत्यक्ष कृती द्वारे बेसिक व्यायामाचे ट्रेनिंग विद्यार्थी विद्यार्थिनींना दिले त्याबरोबरच स्टाफ देखील यात सहभागी झाला होता. ही विशेष बाब आहे. समाजातील ज्या व्यक्तीला आरोग्याचे महत्त्व समजले व्यायामाचे महत्त्व समजले अशा व्यक्ती नसेच्या आहारी जात नाहीत असे स्पष्ट त्यांनी व्यक्त केले. आपल्याला व्यसनमुक्त भारत आणि सशक्त भारत आपला देश बनवायचा आहे त्यासाठी त्याची सुरुवात आपल्यापासूनच करायची आहे आणि हे अशक्य नाही सर्व मुलांनी मुलींनी ठरविले तर नक्कीच आपण सशक्त भारत अभियान नशा मुक्त भारत अभियान यशस्वी करूत. त्यासाठी मन हे अतिशय खंबीर पाहिजे चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी या मनाला कळतात त्यावर मनावर ताबा असणे अत्यंत गरजेचे आहे आणि तो कसा येईल तर तो व्यायामाद्वारे येईल असे मत महेश वैद्य यांनी व्यक्त केले. नशा मुक्त भारत अभियान ही काळाची गरज आहे याची पावले ओळखूनच समाजातील प्रत्येक घटकांनी आत्मपरीक्षण करणे खूप गरजेचे आहे. आणि हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी आपला देश नशा मुक्त तसेच सशक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने या अभियानास जोडले पाहिजे.

या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री स्वप्नील तुपे सर यांनी केली आणि या कार्यक्रमास समाजसेवक श्री महेंद्र निंबाळकर साहेब हे आवर्जून उपस्थित होते. तसेच प्रसाद जोशी, योगेश खूने, सुकात जेवळीकर साहेब, राहुल करंडे, शंकरजी शेंडगे, यांचे सहकार्य लाभले. शाळेच्या वतीने महेश वैद्य यांचा फेटा शाल आणि श्रीफळ देऊन श्री बाळासाहेब गवळी सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा उपक्रम अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे