पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी बाधित गावांची पाहणी ; तात्काळ पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश.

पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टी बाधित गावांची पाहणी ; तात्काळ पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश.
वाळकी विशेष प्रतिनिधी : दादासाहेब आगळे
अहिल्या नगरचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज नगर तालुक्यातील वाळकी ,खडकी अकोळनेर गावांमध्ये जात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची तसेच पुरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळवून देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्रात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, पंचनामे प्रत्यक्ष शेतात जाऊन सविस्तर, अचूक करा. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे समजून घेऊन प्रत्येक नुकसानीची तपशीलवार नोंद घ्यावी. घरांची पडझड, पशुधनाची हानी, इतर जिवीत हानी आदी पंचनाम्याची तसेच तात्काळ मदतीची प्रक्रिया पूर्ण करावी. असे निर्देश ही पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री विखे महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी दिले.
यावेळी या दौऱ्यात अहिल्या नगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, तहसीलदार संजय शिंदे, आमदार श्री. शिवाजीराव कर्डीले साहेब,आमदार श्री. काशिनाथ दाते सर,उपजिल्हाधिकारी पाटील,माजी मंत्री बबनराव पाचपुते,भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विनायक देशमुख,शरद बोठे, संजय गिरवले,भाऊसाहेब बोठे, दादा दरेकर, कृषी अधीक्षक
उपविभागीय कृषी तालुका अधिकारी विकास पाटील, मंडल कृषी अधिकारी कारंडे,विद्युत पुरवठा कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी,पोलिस प्रशासन, तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुकसान ग्रस्त क्षेत्र…
अकोळनेर, सारोळा कासार,खडकी,वाळकी,गुंडेगाव, राळेगण,जुंदरेमळा, येणारेमळा,शिरकांड, आंबेराई,तुकाईमळा,कासारमळा, जळवाडी,धोंडेवाडी,भोलेनाथवाडी, धनगरवाडीआदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सध्याच्या नुकसान झालेल्या पंचनामे तपशील..
सध्याच्या पाहणी दरम्यान जनावरे ३०२ दगावले,घरपडती २४ घरे, कांदा पिक नुकसान २२ हेक्टर,संत्रा २ हेक्टर , पिक लागवड क्षेत्र ३९६४ हेक्टर,सिताफळ १ हेक्टर, विहिरी ११ बुजल्या, बोअरवेल ४ बुजले, शेततळे १, जमीन वाहुन गेली ४८ हेक्टर, एकूण पंचनामे ८० झाले आहेत.अजून पंचनामे काम सुरू आहे.अशी माहिती वाळकीचे तलाठी मनोज मिसाळ यांनी दिली.