Breaking
ब्रेकिंग

गटातटाच्या राजकारणापेक्षा तालुक्याचा विकास हवा असेल तर मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या-: प्रा. रामदास झोळ सर

0 3 9 0 7 2

 

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि.१०/ करमाळा तालुक्यामध्ये गटातटाच्या राजकारणामुळे तालुक्याचा विकास खुंटला असून, करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकास हवा असेल तर मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्या. आपन करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करू, असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील जाहीर सभेमध्ये व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ मंगवडे, ओबीसी काँग्रेस तालुकाध्यक्ष गफूर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, सौ. मायाताई झोळ मॅडम, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष सुहास काळे-पाटील, भिमराव ननवरे, रिपब्लिकन पक्षाचे नेते यशवंतराव गायकवाड, श्रीकांत साखरे-पाटील इं. उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये मकाईचे माजी संचालक सुभाष शिंदे आवर्जून उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, करमाळा तालुक्याचा विकास झाला असे लोकप्रतिनिधी व प्रस्थापित नेते म्हणत आहेत परंतु वर्षानुवर्ष रस्ते, पाणी, वीज याच मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातात परंतु यातील कुठलाही विकास तालुक्यांमध्ये झालेल्या दिसून येत नाही. आजही करमाळा तालुका अत्यंत मागास असून शिक्षणासाठी, रोजगारासाठी, वैद्यकीय उपचारासाठी, करमाळा तालुक्यातील जनतेला बाहेरगावी जावे लागत आहे. ही मोठी शोकांतिका आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योग निर्मिती करणे हे माझे प्रमुख ध्येय असून करमाळा तालुक्यातील सर्वांगीण विकाससाठी मी काम करणार आहे. आज पर्यंत बरेचसे आंदोलने आपण स्वखर्चावर केलेले आहेत मला कुठल्याही सत्तेचा किंवा पैशाचा लोभ नाही. माझे एकच ध्येय आहे करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास तो कसा करता येईल यासाठी मी आज पर्यंत जास्तीत जास्त प्रयत्न करीत आलो आहे आणि यापुढेही करीत राहणार यासाठी मला आपण सर्वांनी आमदार. म्हणून मला एक वेळ आमदार म्हणून निवडून द्यावे तरच या करमाळा तालुक्याच्या करमाळा मतदारसंघाचा मी सर्वांगीण विकास करू शकेल असे वक्तव्य प्राध्यापक रामदास झोळसर यांनी यावेळी व्यक्त केले.

करमाळा तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली प्रस्थापित नेते मंडळींनी जनतेला भुलथापा मारुन दिशाभूल करण्याचे काम केले असून, विकास नुसता कागदावरच झाला आहे. करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‌सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून भिगवण सारख्या ठिकाणी शैक्षणिक संस्था उभा करून आपले कर्तुत्व सिद्ध केलेल्या प्रा. रामदास झोळ सर यांना निवडून द्या. असे आवाहन “शेतकरी कामगार संघर्ष समितीचे दशरथ आण्णा कांबळे” यांनी केले आहे.

करमाळा तालुक्यातील बोरगाव या गावांमध्ये प्रा. रामदास झोळ सर यांचे ग्रामस्थांच्यावतीने हलगी नाद करून जल्लोषात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाची प्रास्ताविक श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नवले यांनी केले. तर मान्यवरांचे आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी व्यक्त केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे