Breaking
ब्रेकिंग

मुळा नदीवरील पुलाच्या कठड्यांनी घेतला मोकळा श्वास…

0 3 9 0 2 0

 

प्रतिनिधी :  जावेद शेख

मुळा नदीवरील राहुरी खु.व राहुरी बु.या दोन गावांना जोडणारा पूल नगर मनमाड रस्त्यावरचा महत्वाचा पूल.पण या पुलाला बांधलेल्या रंगीबेरंगी प्लॅस्टिक पिशव्या पुलाला विद्रूप करत होत्या.त्याचे कारण ही तसेच.नदीपात्रात निर्माल्य विसर्जन केल्यानंतर प्लॅस्टिक नदीत न टाकता ते लोखंडी कठड्याला बांधून ठेवले जातात.नदीत प्रदूषण वाढू नये यासाठी ही खबरदारी ,पण आपली पिशवी परत घेऊन जाण्याची खबरदारी मात्र ही भाविक (?) मंडळी घेत नाहीत.परिणामी पूलाला बांधलेल्या पिशव्या विकृत दिसायच्या.याची जाणीव प्रत्येकाला व्हायची,पण पुढे येणार कोण अन् सफाई करणार कोण?
याच भावनेतून राहुरी खुर्द मधील ज्येष्ठ नागरिक व भटकंती ग्रुप पुढे सरसावला व त्यांनी या सर्व पिशव्या काढून कठड्यांना प्रदूषणमुक्त केले.देवाची पूजा करून फुलांचे निर्माल्य नदीरुपी गटारात टाकणारांना व त्याच्या पिशव्या पुलाला बांधणारांना देव नक्कीच पावणार नाही.पण हे लक्षात घेतो कोण?
राहुरी खुर्द मधील ज्येष्ठ नागरिक गृपने हे काम करुन पुलाचे विकृत रुप बदलवले.
या कामी निसर्ग व पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य संघटक तथा सावित्री बाई फुले विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.बाळासाहेब डोंगरे सर,
शिवव्याख्याते गणेश शिंदे
सेवानिवृत्त कला शिक्षक श्री.प्रकाश साबळे सर प्रा.श्री .रामनाथ डोखे सर,श्री.सतीश सतिष घोडके,श्री.दिवाकर काळे यांनी आपले योगदान दिले.समस्त तरुणाई प्रचारात व्यस्त असताना ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे छोटेसे काम फार महत्वाचा संदेश देऊन गेले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे