वाचन संकल्प महाराष्ट्राचा .पंधरवडा प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात साजरा…..
वाचन संस्कृतीमुळे बौद्धिक विकास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा.... शैलाताई पाटील
वाचन संकल्प महाराष्ट्राचा .पंधरवडा प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयात साजरा…..
वाचन संस्कृतीमुळे बौद्धिक विकास विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा…. शैलाताई पाटील
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
(दि.८डिसेंबर) : बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर प्रचंड वाढला आहे. त्यामध्ये मोबाईलचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे पुस्तक, व इतर ग्रंथ वृत्तपत्र वाचनाकडील कल कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे शासनाने वाचन संकल्प उपक्रम राबवून वाचण्याचे आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे वाचनामुळे चिंतन करण्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढीला चालना मिळते. त्यामुळे वाचन महत्त्वाचे आहे ,असे प्रतिपादन रायगड जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांनी केले “वाचन संकल्प महाराष्ट्र पंधरवडा” शासनाच्या उपक्रमा अंतर्गत प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय व तालुका तालुका ग्रंथालय ,अलिबाग तसेच ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम बुधवार दि.८जाने. रोजी अलिबाग येथील प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालात आयोजित करण्यात आला.यावेळी त्या बोलत होत्या.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघ उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी, कोमसापचे अलिबाग शाखेचे सहकार्यवाह नंदु तळकर,माजी नगरसेवक आर. के.घरत, सार्वजनिक वाचनालय तसेच जिल्हा ग्रंथालय अलिबागचे ग्रंथपाल भालचंद्र वर्तक, हेमकांत सोनार, अलिबाग नगर परिषद शाळा शिक्षिका प्रमिला म्हात्रे, प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे तसेच कर्मचारी झेबा कुरेशी आणि विद्यार्थी वर्ग यावेळी उपस्थित होते.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार कोमसापचे अलिबागचे सहकार्यवाह नंदू तळकर,आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
विद्यार्थ्यांचा सन्मान
======================
“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” पंधरवडा जिल्ह्यात सुरू आहे. अलिबाग नगरपरिषद शाळा क्रं.तीन मधील विद्यार्थ्यांनी या निमित्ताने बुधवारी(दि.८) प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना वाचनालयाची माहिती देण्यात आली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी वाचनालयातील गोष्टींची व इतर विषयावरील पुस्तकांचे वाचन केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी अजित पवार ,जिल्हा ग्रंथालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला,तसेच वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.