Breaking
ब्रेकिंग

*भरावामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पाणीच पाणी होणार ही भिती ठरली खरी; ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबीने काढले पाणी*

0 4 3 3 2 7

*भरावामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पाणीच पाणी होणार ही भिती ठरली खरी; ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबीने काढले पाणी*

प्रतिनिधी: राजेश बाष्टे

अलीबाग: दि. १८/ अलिबाग तालुक्यातील मिळकतखार येथे वासवानी कंपनीने गेली 10 वर्षे टप्प्या टप्प्याने केलेल्या भरावामुळे परिसरातील शेतक-यांच्या शेतात पाणीच पाणी झाले असून वारंवारी तक्रारी करणारे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. ग्रामस्थांनी साचलेले पाणी स्वखर्चाने जेसीबी लावून काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. ग्रामस्थांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे निवेदन सादर करून न्याय मिळण्यासाठी साकडे घातले आहे.

ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये मौजे मिळकतखार, ता. अलिबाग, जि. रायगड येथे गट नं. 47/2 49, 50 व 51 इत्यादी या मिळकतीवर वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांनी केलेल्या अनधिकृत भरावामुळे पाण्याचा मुळप्रवाह बंद झाला आहे. तो पुर्ववत करून दयावा अशी मागणी केली आहे. अर्जदार हे ग्रुपग्रामपंचायत मिळकतखार येथील स्थानिक रहिवाशी आहेत. त्यांची वडिलोपार्जित शेती मौजे मिळकतखार येथे आहे. वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांची ग्रामस्थांच्या शेतजमिनीलगतच मिळकती आहेत. वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांनी काहि स्थानिक गुंड तसेच लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन त्या मिळकतीवर शासनाची महसुल विभागाची कोणतीही परवानगी न घेता तसेच सदरची मिळकत ही खारभूमी पुर्नप्रस्थापित क्षेत्रा मध्ये असून सुध्दा त्याठिकाणी जेएसडब्लू कंपनीचे वेस्टेज (स्लॅग) टाकून त्यांनी अनधिकृतपणे भराव केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या पूर्वीपासूनचा पाण्याचा नाला पुर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांच्या शेतीतून जाणारे पाणी त्याच नाल्यातून जात असे व पूढे रेवस खाडीला मिळत असे. हा पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे आम्ही त्या मिळकतीलगतचे शेतकरी अजूनही त्याठिकाणी शेती पिकवतो व त्यावरच आमचे कुटुंब अवलंबून आहे. तो पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे आमच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

ज्यावेळेस सदरचा नाला जेएसडब्लू कंपनीचे वेस्टेज (स्लॅग) टाकून बुजवला जात होता त्यावेळेस सुध्दा ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी अलिबाग, तहसिलदार अलिबाग यांना भेटून सदरच्या बाबतीत ग्रामस्थानीं लेखी तक्रार दाखल केल्या होत्या. उपविभागीय अधिकारी सा. अलिबाग, यांनी सदरच्या ठिकाणी टाकलेला अनधिकृत स्लॅग ज्यामुळे नाला बुजला आहे तो नाला पुर्ववत करुन देऊन सदर ठिकाणी झालेला जेएसडब्लू कंपनीचे वेस्टेज (स्लॅग) चा भराव काढण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले होते. वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांच्यावर मांडवासागरी पोलीस स्टेशन येथे या अनधिकृत भरावाबाबत 2014, 2022, जानेवारी २०२५ मध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. पावसाळा सुरू झाला असून त्याठिकाणी टाकलेला अनधिकृत स्लॅग व माती न काढल्यास आमचे अतोनात नुकसान झाले आहे.

आम्हा गरिख शेतक-यांच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचवाव्यात आम्ही आजही आमच्या जमिनी पिकवत आहोत परंतु त्याठिकाणी टाकलेला जेएसडब्लू कंपनीचे वेस्टेज (स्लॅग) मुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे. वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांनी टाकलेला जेएसडब्लू कंपनीचे वेस्टेज (स्लॅग) तात्काळ काढून सदर ठिकाणी असलेला पुर्वीपासूनचा नाला पुर्ववत करुन आमच्या जमिनी नापीक होण्यापासून वाचवून त्याठिकाणी वरुण गोविंद वासवाणी वगैरे यांना कोणत्याही प्रकारच्या भरावाची परवानगी देऊ नये अन्यथा आमच्या होणा-या नुकसानीस प्रशासन जबाबदार असेल असा इशारा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना लिहीलेल्या पत्रामध्ये दिला आहे.

5/5 - (1 vote)

Suryakant Honap

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे