भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीची सांस्कृतिक कार्यक्रमातून महामानवास मानवंदना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राहुल डंबाळे तर माता रमाई समाजभूषण पुरस्काराने उत्कर्षा रुपवते सन्मानित

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीची सांस्कृतिक कार्यक्रमातून महामानवास मानवंदना
डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण राहुल डंबाळे तर माता रमाई समाजभूषण पुरस्काराने उत्कर्षा रुपवते सन्मानित
संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव
श्रीरामपूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीच्या वतीने भारतीय घटनेचे निर्माते,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या
जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी दिला जाणारा मानाचा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांना तर त्यागमूर्ती माता रमाई समाजभूषण पुरस्काराने वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते यांना सन्मानित करण्यात आले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन,मा.शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ, फेटा बांधून तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी आंबेडकर चळवळीमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल भीमा कोरेगाव विजयस्तंभ स्मारक समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे तसेच महिलांच्या प्रश्नावर सडेतोड भूमिका घेऊन महिलांना न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या,महिलांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या,राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून महिलांसाठी न्याय देण्याचे कार्य करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य तथा वंचित बहुजन आघाडी राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांना कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रेल्वे स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका जवळ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव एकता समिती तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सायंकाळी मुंबई येथील महाराष्ट्रभर गाजत असलेल्या नितीश कुमार व नरेश कुमार प्रस्तुत भीम सूर्य क्रांतीचा समाज प्रबोधन पर भीम गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मुंबई येथील शाहीर नितीन बनसोडे,गायक नरेश बडेकर,गायिका पल्लवी खरात आणि पूनम कदम यांनी आपल्या सुरेल आवाजात भीमगीते सादर करून भीम अनुयायांची मने जिंकली.सदर कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला.
यावेळी सदर कार्यक्रमास
चरण त्रिभुवन,सुमेध पडवळ,
संघराज त्रिभुवन,बाळासाहेब बागुल,हनीफ पठाण,सुनील मगर,अंबादास निकाळजे,
बाबासाहेब पवार,अर्जुन शेजवळ,शिवा साठे,
पी.एस.निकम,रवींद्र गायकवाड,किशोर ठोकळ,रॉकी लोंढे,रज्जाक पठाण,एजाज पठाण,राकेश थोरात,भारत त्रिभुवन,वसंत साळवे,सतीश त्रिभुवन,मिलिंद धीवर,सुरेश शेळके,अशोक दिवे,संतोष त्रिभुवन तसेच महिला आघाडीच्या सुशीलाताई त्रिभुवन,
ॲड.सोनाली त्रिभुवन,कांताबाई जाधव,आशाबाई रुद्राक्ष,
बुद्धप्रिया त्रिभुवन,संगीताताई गायकवाड,प्राजक्ता त्रिभुवन यांच्या सह कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात समाज बांधव, महिला,पुरुष,विविध संस्था संघटनांचे कार्यकर्ते,
पदाधिकारी,समाज बांधव उपस्थित होते.