Breaking
ब्रेकिंग

निवडणुकीत पराभव होत असतात, परंतु कायम जनसंपर्क आणि मागिल विकासकामांच्या जोरावर करमाळ्याच्या जनतेचे खरे आमदार संजयमामा शिंदे हेच:- ॲड. अजित विघ्ने

0 4 0 3 8 4

निवडणुकीत पराभव होत असतात, परंतु कायम जनसंपर्क आणि मागिल विकासकामांच्या जोरावर करमाळ्याच्या जनतेचे खरे आमदार संजयमामा शिंदे हेच:- ॲड. अजित विघ्ने

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १३/ करमाळा तालुक्यातील राजकारणात रोज नवनवीन घडामोडी आपण पहातो. गटातटाच्या आधारावर राजकारण करणारे प्रबळ गट या ठिकाणी अस्तित्वात आहेत. जगताप – बागल – पाटील – शिंदे असे प्रभावी गट या ठिकाणी अस्तित्वात आहेत. तसे पाहता शिंदे गट हा सन २०१४ च्या निवडणुकी पासुनच खऱ्या अर्थाने करमाळा तालुकयात स्थिरावला परंतु २०१९ ची आमदारकीची माळ माजी आमदार संजयमामा शिंदेच्या गळ्यात पडली आणि खऱ्या अर्थाने करमाळा तालुक्याच्या राजकारणची दिशा बदलली. शिंदे गटाच्या प्रवेशामुळे करमाळा तालुक्याला एक नवे आश्वासक नेतृत्व मिळाले. अनेक गावोगावची मंडळी आज माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे बरोबर असल्याचे दिसते. सन-२०२४ च्या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा पराभव झाला परंतु तो नक्कीच करमाळा – माढा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हारी लागला.

सन २०१९ ते २०२४ आणि तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा मतदार संघात प्रचंड वेगाने विकासकामे आणली. आजही ती कामे चालु आहेत. करमाळा मतदार संघात कोणती व कशाची निकड आहे हे पाहुन आमदार संजयमामांनी काम चालु केले. आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही करमाळ्याच्या विकासकामाचा आराखडा तयार केला नव्हता एवढा चांगला आराखडा त्यांनी आखला. पाणी, वीज याला प्रथम प्राधान्य देत विकासकामे चालु केली. दहीगाव योजनेसाठी सुधारीत प्रस्तावास मान्यता घेऊन कॅनॉलचे अस्तरीकरणासह, बंधिस्थ पाईपलाईन द्वारे शेवटच्या गावापर्यंत पाणी नेहण्यासाठी योजना मंजुर करून आणली. कुकडीच्या आवर्तनांसह, उजनी-कुकडी प्रकल्प राबविण्यासाठी केत्तुर उद्भव ते चिलवडी चारी व वाशिंबे उदभव ते पोंधवडी चारी अशा दोन नविन योजनांसाठी आग्रही भुमिका मांडली. करमाळा शहरासह ग्रामिण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम केली. सर्वच शासकीय इमारतींच्या नविन बांधकामांना भरघोस निधी मिळवला. विजेचा प्रश्न कायमस्वरूपी हद्दपार करणेसाठी नविन सबस्टेशन उभारणी, जादा ट्रान्सफार्मर बसवले त्यामुळे विजेचा प्रश्न मिटविण्यात यश मिळाले. महत्वाच्या डिकसळ पुलाचे कामाची मंजुरी, कुगावचे पुलाकरीता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री भरणेमामांना सहकार्य, नविन चांडगाव ते पोमलवाडी पुलाची केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितिनजी गडकरी यांचेकडे मागणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडे देखिल प्रस्ताव सादर केला. याबरोबरच गोयेगाव ते आगोती पुलासाठी पत्रव्यवहार केला. रस्त्यांसाठी नविन तंत्रज्ञान राबवुन तालुक्यातील रस्ते मजबुत करण्यासाठी मंजुरी मिळवली. करमाळा मतदार संघाकरीता संजयमामांनी विविध विभागाकरीता मिळून ३५०० कोटींची विकासकामे मंजुर करून घेतली. परंतु प्रत्यक्षात कामाचे टेंडर प्रक्रीया व तांत्रिक गोष्टींमुळे उशिराने कामे चालु झाली त्यामुळे विरोधकांना कागदावरचा विकास म्हणुन दोष द्यायला चान्स मिळाला.

करमाळा तालुक्यातील जनता नेहमी प्रमाणेच भुलथापा देणाऱ्या पुढाऱ्यांच्या बोलण्याने फसली. मराठा आरक्षणासाठी चाललेले आंदोलन, ओबीसी समाजाची झालेली एकजुट, महायुती विरुद्ध ऊसळलेली लोकसभेतील लाट या पार्श्वभुमीवर कार्यकर्त्यांनी अपक्ष विधानसभा लढविण्याचा केलेला आग्रह ही जरी पराभवाची कारणे असली तरी जनतेच्या मनातला खरा आमदार संजयमामा शिंदे हेच असल्याचे आता स्पष्टपणे बोलले जात आहे. सोलापुर जिल्हयाच्या राजकारणात आजपर्यंत करमाळ्यात घडणाऱ्या राजकीय उलथापालथी पाहिल्यास कधी नव्हे त्या पार्ट्या स्वतःचे अस्तित्वाकरीता आणि एकट्या संजयमामा शिंदे यांना रोखण्या करीता पुढे आल्या आणि संजयमामांचा पराभव केला. परंतु एकट्या संजयमामांना रोखण्यासाठी चार चार वेगवेगळ्या विचारांच्या शक्तींनी एकत्र यावे यातच शिंदे गटाचा व आमदार संजयमामा शिंदे यांचा नैतिक विजय आहे असेच म्हणता येईल.

जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतलाय. कोणी कुठेही रोज पक्ष बदलत आहेत. दिशाहीन राजकारणाचे चित्र सर्वत्र दिसत आहे परंतु संजयमामा आपले नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेवरची निष्ठा सांभाळुन संयमी भुमिकेतुन आपली ताकद सिद्ध करत आहेत. करमाळ्याच राजकारण उदया अनेक वेळा बदलत राहील, परंतु हा व्हीजन बाळगुन असलेला नेताच करमाळ्याच्या जनतेच्या मनातला खरा आमदार आहे हे स्पष्ट दिसुन येतय.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे