महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर . . .
गेल्या तीन दिवसापासून पाणी बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर . . .
गेल्या तीन दिवसापासून पाणी बंद असल्याने कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल
राहुरी विशेष प्रतिनिधी : जावेद शेख
राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन दिवसापासून पाणी बंद असल्याने विद्यापीठातील रहिवासी कर्मचारी ,विद्यार्थी,तसेच कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.विद्यापीठाला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिनीवर असणाऱ्या विद्युत मोटार खराब झाल्याने पाणीपुरवठा खंडित झाला आहे .या ठिकाणी पर्यायी मोटारीची व्यवस्था नसल्याने विद्यापीठांसमोर मोठे जल संकट उभे राहिले आहे .विद्यापीठाचे बांधकाम अधिकारी हे शहरी भागात राहत असल्याने विद्यापीठात निर्माण होणाऱ्या समस्या व त्याबाबतचे गांभीर्य यांना नसल्याने मस्त मौल जीवन जगणाऱ्या या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे विद्यापीठात तीन दिवसापासून पाणीपुरवठा बंद झाल्याने येथील रहिवासी कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत .वास्तविक पाहता पाणी ही मूलभूत गरज असताना हे पाणी नागरिकांना पुरविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असून जर या यंत्रणेत काही बिघाड झाला तर तात्काळ पर्यायी व्यवस्था बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करायला हवी होती परंतु ही व्यवस्था नसल्याने विद्यापीठात पाण्यासाठी सर्वांनाच वणवण करायची वेळ आलेली आहे .
आम्हाला . . . . धुवायला सुद्धा पाणी नाही.
विद्यापीठ कॅम्पस मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना या जल संकटाचा सामना करताना नाकी नऊ आले आहे.ऑफिसला जाऊन काम करावे की घरी पाणी भरावे हा प्रश्न विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडे उभा आहे. स्वयंपाकाला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही .होस्टेलवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पाणी नसल्याने त्यांचे काय हाल होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी . आम्हाला . . . धुवायला सुद्धा पाणी नाही . विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी याबाबत गंभीर दखल घ्यायला हवी होती परंतु लोकांचं काहीही होवो आम्हा काय त्याचे या पद्धतीत विद्यापीठाचा कारभार चालू आहे .
सर्वत्र बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराची चर्चा सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . तसेच विद्यापीठाला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलावाला चारही बाजूने मोठ्या प्रमाणात गळती लागाली आहे त्या मुळे हजारो लीटर पाणी रोजच्या रोज या साठवण तलावातून वाहुन जात आहे मुळा उजवा कालवा काटोकाट भरून वा हात आहे तसेच विद्यापीठाला पाणी पुरवठा करण्यासाठी १५ कोटी रुपये खर्चून मोठी पाणी पुरवठा योजना उभारली आहे तरी ही विद्यापीठचे विद्यार्थी व निवासी कर्मचारी पाणी पाणी करत आहेत परंतु विद्यापीठी अभियंत पिठ खाण्यात दंग असल्याने त्यांना विद्यापीठातील वसाहतीत राहाणाऱ्या कर्मच्याऱ्यांचे सोई सुविधांचे काहीही सोयर सुतक दिसुन येत नाही वरिष्ठानी लक्ष घालावे अशी निवासी कर्मच्याऱ्यांची मागणी आहे