Breaking
ब्रेकिंग

पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू . ..

0 3 9 0 4 0

पोहायला गेलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी : जावेद शेख

राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थी शाळा बुडवून पाटामध्ये पोहण्यासाठी गेले होते .
पाण्यामध्ये पोहत असतांना त्यातील दोघे पाण्यात बुडायला लागल्याने आरडा ओरडा करू लागले . त्यांचा आवाज ऐकून काही अंतरावर असलेले भानुदास रोडे, प्रशांत गावडे व अजय गावडे यांनी पाटाकडे धाव घेत पाण्यात उड्या मारून चार विद्यार्थ्यांना बाहेर काढले परंतू एक विद्यार्थी पाण्यात खोलवर गेल्याने व पाण्याची गती जास्त असल्याने चि. संकेत श्रीपती तरटे या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे विद्यापीठ परिसर व सावित्रीबाई फुले विद्यालयात शोककळा पसरली आहे .

सदर घटनेची माहिती मिळताच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी घटनास्थळी धाव घेत अनेक तरुणांना बरोबर घेऊन पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचे शोध घेतला .
तरटे या विद्यार्थ्या बरोबर पोहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधिन करण्यात आल्याचेही सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सांगितले आहे .

इयत्ता 10 व 12 वी ची बोर्डाची परीक्षा तोंडावर आली असताना गेल्या दोन दिवसांपासून हे विद्यार्थी शाळेत गैरहजर राहत असल्याची माहिती समोर आली आहे .
घरून शाळेसाठी गेलेले विद्यार्थी शाळेत न जाता इतरत्र वेळ घालवून पालकांची व शाळेची दिशाभूल केल्याने ही घटना घडली असल्याचे चित्र दिसून येत आहे .
सदर झालेली घटना अतिशय दुर्दैवी घडली असून यामुळे अतिशय दुःख झाल्याचे विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहिरे यांनी सांगितले आहे .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे