Breaking
ब्रेकिंग

भविष्यातील राजकारणाचा विचार न करता तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद यांचा विचार करून बागल गटाने निर्णय घ्यावा:- हनुमंत मांढरे पाटील

0 3 9 0 3 1

भविष्यातील राजकारणाचा विचार न करता तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी, सभासद यांचा विचार करून बागल गटाने निर्णय घ्यावा:- हनुमंत मांढरे पाटील

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १४/ करमाळा तालुक्यातील अदिनाथ सह. साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाने निवडणूक न लढण्या निर्णय स्वागतार्ह आहे. त्याच पध्दतीने भविष्यातील राजकारणाचा विचार न करता महायुतीचा धर्म पाळून मा. आ. संजय मामा शिंदे यांना पाठींबा जाहीर करण्याचा निर्णय घ्यावा या निवडणूकीत मा. आ. संजय मामा शिंदे व आ. नारायण आबा पाटील अशी लढत होत आसताना निवडणूकीतून माघार घेतलेल्या बागल गटाच्या भूमिके बद्दल तालुक्यात तर्कवितर्क लढवले जात आहेत परंतु मा. आ. संजय मामा शिंदे हे महायुती मधील सर्व घटक पक्षांना एकत्र घेऊन त्यांना सन्मान जनक न्याय देवून निवडणुकीत सामोरे जात आहेत रश्मी बागल या भाजपच्या पदाधिकारी आहे तसेच दिग्विजय बागल शिवसेना शिंदे साहेब यांचे विधानसभा उमेदवार होते. आज ही ते त्यांच्या सोबत आहेत त्यामुळे बागल गटाची मा. आ. संजय मामा शिंदे यांना सोडून वेगळी भूमिका असण्याचं कारणच नाही आणि तो असा अविचार देखील करणार नाहीत. स्व. दिगंबरराव बागल मामांनी तालुक्यातील विकासाच्या बाबतीत नेहमीच म्हत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांच्याच विचारां वरती आज बागल गट तालुक्यात काम करत आहे त्यामुळे आदिनाथ कारखान्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचं आसेल तर मा. आ. संजय मामा शिंदे शिवाय पर्याय नाही हे त्यांना देखील ज्ञात आहे त्यामुळे विकासाच्या दृष्टीने पायात पाय न घालता हातात हात घालून बागल गट काम करेल असा मला विश्वास. आहे सन २०२९ विधासभेच्या दृष्टीने बागल गटाला युतीधर्म पाळणं फायद्याचं ठरू शकते आसे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मा. तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे- पाटील यांनी व्यक्त केले .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे