गुराखी ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक प्रा. संभाजी लावंड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित..
गुराखी ग्रामीण कथासंग्रहाचे लेखक प्रा. संभाजी लावंड यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित..
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चळवळीचे मुख्य केंद्र, मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेचे आयोजित ८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच. कोरेगाव एकंब येथील छत्रपती संभाजी महाराज साहित्य नगरी फुलाई मंगल कार्यालय येथे रसिक, वाचक, लेखक साहित्य प्रेमींच्या सहवासात थाटामाटात पार पडले.सदर कार्यक्रमास अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर उपस्थित होते. कार्यक्रमा तील मान्यवरांचे स्वागत झाल्या नंतर परिसंवादाला सुरुवात झाली. अभिजात मराठी भाषेची भविष्यातील दशा आणि दिशा या विषयावर ज्येष्ठ लेखक राजेश थळकर.अलिबाग रायगड यांनी यथार्थपणे विषयाच्या अंतरंगात हात घातला. प्रमुख वक्ते मा. सुनंदा बागडे कोल्हापूर उपस्थित होत्या. या कार्यक्रमा नंतर पुरस्काराने फक्त सहा लेखक व कविंना सन्मानित करण्यात आले. यामध्ये एकूण चारशे ते पाचशे पुस्तकातून सहा जणांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली.त्या पैकी नवोदित लेखक श्री. संभाजी लावंड. वाई. यांच्या गुराखी या ग्रामीण कथा संग्रहास राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार मान्यवरांचे हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. दुपारच्या सत्रात कवी संमेलनाला तीस कवींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये संभाजी लावंड यांनी बाई खेळण्यात दंग! कशी जाहले मी दंग ही कविता सादर करुन प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या साहित्य निर्मितीला सातारा कराड व वाई पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या साहित्य संमेलनाला नाशिक येथील ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे, मावळते संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुरेश लोहार, सनमेलनाध्यक्षा ज्येष्ठ लेखक डॉ विनायक जाधव, रहिमतपूरचे प्राचार्य अनिल बोधे, प्रा. प्रकाश बोधे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, कोरेगावचे प्रा बरसावडे आदी मान्यवर उपस्थित होती, या संमेलनाला साहित्य प्रेमी रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद दिला होतात हे विशेष होय.कार्यक्रमाची सांगता उत्कृष्ट
भावगीताने करण्यात आली.