छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आनंद योगदान
डॉ .आनंद साळुंके सर यांचा 27 मार्च रोजी विशेष सत्कार होत आहे त्या निमित्ताने

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आनंद योगदान
डॉ .आनंद साळुंके सर यांचा 27 मार्च रोजी विशेष सत्कार होत आहे त्या निमित्ताने
राहुरी अहमदनगर वृत्तसेवा : जावेद शेख
डॉ आनंद साळुंके सर हे मागील वर्षात महात्मा फुले कृषी विद्यापीठ सेवेतून विभाग प्रमुख कृषि विद्या या पदावरून सेवा निवृत झाले त्या निमित्ताने आणि शेतकरी कार्यशाळेच्या आयोजन करत त्यांच्या कार्याचा विशेष सत्कार होत आहे यासाठी विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत असणारे तुकाराम महाविद्यालय कन्नड,इतिहास विभाग आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे ही पत्रिका वाचून मलाही आनंद झाला कारण व्यक्तीने केलेली सेवा ही समाजात विसरल्या जात नाही म्हणून दोन शब्द लिहावे असे मला वाटले डॉ साळुंके सर हे चिमणापूर कन्नड जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथील रहिवाशी आहे आणि विशेष त्यांचे आचार्य गुरुजी हे राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक संशोधन राहिलेले स्वर्गीय डॉ जी टी नानकर सर होते ऊसात बटाटा आंतरपीक ही पीक पद्धती त्या काळी खूप प्रसिद्ध झाली असो
ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ सेवेत राहुरी येथे होते पण खरीप आणि रब्बी हंगामाच्या निमित्ताने ते छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांसोबत होते या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याची दळणवळन ही त्या विद्यापीठात असायची या विद्यापीठाचे खरिपातील आणि रब्बी पिकाचे वान शेतकऱ्याप्रती लोकप्रिय होती नेमकी बियाणे विभागाची जबाबदारी ही डॉ आनंद साळूंके सर मागील पाच सात वर्षापासून सांभाळत होते कारण शेतकऱ्यांना हंगामात उत्तम बियाणे उपलब्धता होणे ही शेतकऱ्याची मोठी कसरत असायची ही कसरत कमी करण्याचे काम त्यांच्या प्रयत्नाने झाले कारण सामान्य शेतकरी बांधवाची थेट ओळख नसते अशा वेळी ठराविक वाणाचे बियाणे मिळेल की नाही अशी साशंकता असायची ही साशंकता त्यांच्या कौशल्याने दूर व्हायाची खरिपात आणि रब्बी पेरणी हंगामात ते अगोदर विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर कार्यालयात त्यांच्या विद्यापीठ बियाणे उपलब्धता माहिती करून देत असत ही माहिती शेतकऱ्यांना मिळत असत त्यामुळे शेतकरी बांधवाच्या रिकाम्या हेलपाटे होत नसे
कारण कृषि विद्यापीठात सेवा करायची तर ती शेतकरीभीमुख असलीच पाहिजे मग शास्त्रज्ञ संशोधनातील , कृषि शिक्षणातील अथवा कृषी विस्तार विभागातील असो, शेतकऱ्यांना तुमच्या मोठ्या पदाची माहिती नसली तरी शेतकरी हे सेवेची आठवण नक्की ठेवतात त्यामुळे सेवा ही शेतकरीभीमुख असलीच पाहिजे असे मत डॉ आनंद साळुंके सर यांचे होते
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील थोर कृषी विस्तार शास्त्रज्ञ स्वर्गीय डॉ श्रीनिवास लोध यांच्यामुळेच माझी ओळख डॉ आनंद साळुंके सर यांच्यासोबत झाली तो प्रसंग आज ही स्मरणात आहे
वर्ष 2005 साली सर्वप्रथम राहुरी कृषी विद्यापीठात केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने कृषी तंत्रज्ञान सप्ताह 2005 हा राबविला गेला त्या कार्यक्रमात डॉ लोध सर यांनी ओळख करून दिली ही ओळख जोपासत, वृद्धिंगत करत या शास्त्रज्ञांचा उपयोग कसा शेतकरी बांधवांना होईल याचा मीही विचार करत होतो त्यांनी तत्पर सेवा दिली हे विशेष स्वभाव वैशिष्ट्ये त्यांचे आहे मी तर याही पुढे असे म्हणेल की जिल्ह्यासाठी नाही तर त्यांच्याकडे येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि बियाणे उपलब्धता वेळेवर करून देणे ही जबाबदारी त्यांनी स्वेच्छेने स्वीकारली असे मी आज आवर्जून म्हणू शकतो पण ही सेवा आता सेवापोकळीत नक्कीच गेली आता येणारे वर्ष 2025 च्या खरिपा हंगामात त्या खुर्चीवर आनंद सेवा नाही याची जाणीव होत आहे आम्ही सर्व या सेवेपासून पारखे होऊ याची खंत आहेच पण शेवटी सेवा म्हटल की सेवानिवृत्ती आलीच याला कोनीही अपवाद नाही पण यांच्या सेवेचे साफल्य झाले असे खात्रीने म्हणू शकतो
या त्यांच्या नियोजित सत्कारासाठी खूप खूप शुभेच्छा तसेच पुढील आयुष्यात सुख ,समृद्धी ,आणि आता महत्वाचे ईश्वर स्मरणात नेहमी जावो हीच माऊली चरणी प्रार्थना – – – रामेश्वर ठोंबरे ( विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजी नगर )