Breaking
ब्रेकिंग

लेवे गुजर पंचायत सभा – विवाह व्यवस्थेतील अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी ठोस पावले

0 3 9 0 4 8

लेवे गुजर पंचायत सभा – विवाह व्यवस्थेतील अनिष्ट प्रथा रोखण्यासाठी ठोस पावले

प्रतिनिधी :- पंकज पाटील

रावेर – लेवा गुजर पंचायत सभेचे आयोजन मोठे वाघोदे येथील श्री चक्रधर शिक्षण मंडळ संचालित प्रकाश विद्यालय येथे करण्यात आले होते. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या सभेसाठी रावेर, बुरहानपूर, चोपडा, मुक्ताईनगर आणि जामनेर या परिसरातील अनेक समाजप्रेमी उपस्थित होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. भागवत विश्वनाथ पाटील, निंबोल, यांनी भूषविले.
सभेच्या प्रास्ताविकेत जी. एम. पाटील यांनी समाजात विवाहानंतर किंवा विवाह ठरविल्यानंतर निर्माण होणाऱ्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या विवादांवर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, या विषयावर चर्चा करून ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. विवाह जुळल्यानंतर काही वेळा दोन्ही कुटुंबांमध्ये वाद होतात आणि यामुळे नातेसंबंध तुटतात. विशेषतः पैशाच्या देवाण-घेवाणीवर कोणतेही बंधन नसल्यामुळे या समस्येला अधिक वाव मिळतो. त्यामुळे उपस्थितांना आपली मते मांडून योग्य तो निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी समाजातील पुढील मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले
*श्रीराम महाजन*:-(अंतुर्ली-जामनेर): समाजासाठी भोर पंचायतीच्या धर्तीवर एक समिती स्थापन करून नियमावली तयार करावी. यामुळे अनावश्यक आर्थिक मागण्यांना आळा बसेल.
*प्रेमराज विठ्ठल पाटील (चिंचोल)*: – विवाह किंवा सोयरीक मोडीत निघाल्यास मुलीच्या कुटुंबाकडून अवास्तव पैशांची मागणी केली जाते. उच्चवर्गीय कुटुंबे या मागण्या पूर्ण करू शकतात, परंतु सर्वसामान्य कुटुंबांना हे शक्य होत नाही. त्यामुळे अशा मागण्यांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
*राहुल पाटील (गुरुजी, निंबोल): -* तरुण पिढीशी चर्चा करून त्यांच्या सहभागातूनच यावर उपाययोजना करावी. यामुळे युवा वर्गाला या विषयाची जाणीव होईल आणि समाजात सकारात्मक बदल घडेल.
*अतुल पाटील (मोठे वाघोदा – अप्पा):-* विवाह मोडणे किंवा घटस्फोट घेणे हा गंभीर विषय आहे. समाजाला लागलेल्या या संसर्गजन्य समस्येवर उपाय म्हणून कठोर नियम बनवणे आवश्यक आहे. तसेच, मुलीच्या कारणामुळे विवाह मोडला, तर तिच्या कुटुंबाकडूनही खर्च वसूल केला जावा.
*अंकुश राजेंद्र चौधरी (चांगदेव): -* भोरगाव पंचायतच्या आधारावर निर्णय घेणे आवश्यक आहे. मुख्य उद्देश पंचायत समिती स्थापन करून समाजातील या समस्येवर तातडीने कार्यवाही करणे हा असावा.*सतीश श्रीराम पाटील (निंबोल): -* विवाह सोहळ्यातील अनावश्यक प्रथा बंद झाल्या पाहिजेत. त्यांनी स्वतःच्या मुलीच्या विवाहात मेहंदीसारख्या प्रथा बंद केल्याचे उदाहरण देऊन यासंदर्भात जनजागृती करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
*श्रीराम महाजन:-* समाजातील जाणकार व्यक्तींना समाविष्ट करून २१ सदस्यीय कमिटी स्थापन करावी, जेणेकरून सर्वसमावेशक निर्णय घेतले जातील.
*राजीव रघुनाथ पाटील (रावेर):-* समितीत स्पष्ट आणि ठाम भूमिका घेणाऱ्या लोकांचा समावेश असावा. समिती कायदेशीर अधिष्ठानावर कार्य करणार का, याचाही तपास करावा.
*जी. एम. पाटील (मेहूण):-* हा विषय कायद्याऐवजी नैतिकतेच्या आधारावर हाताळायला हवा. समाजातील सर्व व्यक्तींनी यात सहकार्य करून त्याला बळ द्यावे.*किशोर पाटील (मोठे वाघोदा): -* समितीने नैतिक मूल्यांवर काम करावे आणि दोन्ही कुटुंबांच्या बाजू ऐकून योग्य तो न्याय द्यावा.
*राहुल पाटील (मोठे वाघोदा):-* आजच्या सभेत कोअर कमिटी तयार करणे गरजेचे आहे आणि त्यात प्रौढ व्यक्तींचा समावेश असावा.

*श्रीराम महाजन:-* विवाह किंवा साखरपुडा मोडल्यानंतर केवळ दागिने परत करावेत. कोणत्याही परिस्थितीत पैशांची देवाणघेवाण होणार नाही, असा ठराव मांडला, ज्याला सर्व सभासदांनी संमती दिली.
संस्थेच्या अध्यक्षांचे विचार आणि समिती स्थापनेचा निर्णय अध्यक्षीय भाषणात श्री. भागवतभाऊ विश्वनाथ पाटील यांनी समाजातील अनिष्ट प्रथांची वाढ होत असल्याचे नमूद केले आणि त्यावर चिंता व्यक्त केली. त्यांनी या संदर्भात मुंबई मंडळाने पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी सर्वानुमते पुढील समीती स्थापन झाली:- भागवत विश्वनाथ पाटील, निंबोल राजीव रघुनाथ पाटील, रावेर किशोर जगन्नाथ पाटील, मोठे वाघोदे श्रीराम गरबड महाजन, अंतुर्ली अरुण नारायण पाटील, दापोरा अंकुश राजेंद्र चौधरी, चांगदेव वसंत विश्वनाथ महाजन, तांदलवाडी जी. एम. पाटील, मेहूण राजेंद्र मधुकर महाजन, जामनेर पांडुरंग रामभाऊ महाजन, लोणी प्रदीप गंभीर पाटील, कुंभारखेडा
सभेतील सर्व उपस्थित सदस्यांनी या समितीस मंजुरी दिली .

सभेच्या ठिकाणाची निवड प्रकाश विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजच्या सुंदर आणि स्वच्छ परिसरात करण्यात आल्यामुळे सर्व समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. अनेक वक्त्यांनी संस्थेच्या संचालक मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. सभेची संपूर्ण व्यवस्था श्री. चक्रधर शिक्षण मंडळ, वाघोदा, यांनी केली. तसेच, जेवण व्यवस्थेचे नियोजन श्री. किशोर पाटील यांनी केले. याबद्दल दोन्ही पक्षांचे आभार मानण्यात आले. शेवटी, अध्यक्षांच्या संमतीने सभा यशस्वीरित्या संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे