Breaking
ब्रेकिंग

भारतातील पहिली माहिला डाॕक्टर आनंदीबाई जोशी अलिबागची

0 4 0 3 8 5

भारतातील पहिली माहिला डाॕक्टर आनंदीबाई जोशी अलिबागची

लेखक – बळवंत वालेकर

अलिबाग हे निसर्ग रमणीय ठिकाण आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची भूचुंबकीय वेधशाळा येथे आहे. पर्यटकांचे ते आवडते ठिकाण आहे . सरखेल कान्होजी राजांची राजधानी येथेच (कुलाबा किल्ल्यात ) होती . हा इतिहास जपण्यासाठी ब्रिटिश शासनाने आपल्या जिल्ह्याचे नाव *कुलाबा जिल्हा * ठेवले होते . ते जिल्ह्याचे मुख्यालय आहे . याच अलिबाग शहराचे नाव अनेक आसामींनी सतासमुद्रापार नेले आहे. त्यापैकी *डाॕक्टर आनंदीबाई जोशी* या विदूषी आहेत .
सुमारे २०० वर्षांपूर्वीचा काळ. अंधश्रद्धा , अशिक्षितता व दारिद्रयाचा सर्वत्र अंधार , होता . ब्रिटिशाँकडून जातीयतेस खतपाणी घातले जात होते . ” मुलगी ” जन्मली की तिचे सर्वत्र तिरस्काराने स्वागत होत असे . अशाकाळात जोशी कुटुंबात “यमुनाबाई” ही निरागस पण तल्लख बुद्धीची मुलगी जन्मली. तिच्या वडिलांचे नाव गणपतराव. वडिलांनी या मुलीस लाडाने वाढविले, संस्कारही केले . मुलगी खेळण्यात , गाण्तात , बोलण्यात , कामात चतुर होती . रीति – रिवाजाप्रमाणे लहानपणीच लग्न करीत असत. वडिलांची धावाधाव सुरू झाली . शेवटी कल्याण येथे पोष्टमास्तर असलेल्या गोपाळराव जोशी यांच्याशी ग्रह जुळले व लहानपणीच शुभमंगल झाले . परंतु गोपाळराव बिजवर होते . तरीही कोणतेही आढेवेढे न घेता गणपतरावांनी आपल्या कन्यकेचे लग्न जुळविले. “जावई” गोपाळराव जिद्दी होते . रुढी – परंपरा व अंधश्रद्धांना फाटा देणारे होते . शिक्षणात विशेष रस होता . म्हणून त्यांनी अशिक्षित असलेल्या आनंदीबाईस – पूर्वाश्रमीची यमुना –
“शिक्षित” करण्याचे ठररविले. पण यमुनाबाई साथ देईना . शेवटी गोपाळराव जिद्दीस पेटले . अक्षरशत्रू असलेल्या यमुनाबा ईचा उजवा हात धरून “बाराखडी ” शिकविली. यमुनाकडून प्रतिसाद नसतानाही गळी उतरविले. वेळप्रसंगी बळजबरी केली . महत् प्रयासाने यमुना बाईस बाराखडीत तसेच १ ते १०० अंक लिहिण्यात “रस” निर्माण झाला.
आनंदीबाई मूलतः बुद्धीमान , तडफदार व एकपाठी होत्या . गणित विषयात तरबेज होत्या. बाराखाडी व १०० अंक लिहू लागताच त्यांना वाचनाची व लेखनाची आवड निर्माण झाली . गोपाळरावांना स्त्री शिक्षणाचा ध्यास होता . मुलांप्रमाणे मुली शिकल्या पाहिजेत . सर्व क्षेत्रात त्यांना प्राधान्य मिळायला हवे , “चूल अन् मूल ” एवढेच त्यांचे कार्यक्षेत्र सीमित नाही . तसेच *पुरुषप्रधानपद्धतीत* त्यांची गळचेपी केली आहे . “प्रत्यक्षात त्या पुरुषांपेक्षा अधिक कार्यक्ष म तसेच सहनशील , चिकाटीखोर . व जिद्दी आहेत. संकटावर त्या लीलया मात करतात . पण रुढी परंपरा व अंधश्रद्धेच्या गर्तेत त्यांचे पंख छाटले जातात . , हे गोपाळराव जोशी यांना मान्य नव्हते . या रुढी – परंपरा , अंधश्रद्धा अरबीसागरात बुडविण्याचे काम गोपाळरावांनी केले. याची सुरूवात स्वतःच्या घरापासून ( पत्नीपासून) केली. पतीच्या या क्रांतिकारक कामात पत्नी आनंदीबाईने क्रुतीने साथ दिली.
या पुरोगामी विचार सरणीच्या जोडप्यावर समाजाने टीकेची झोड उठवली. शिकणे , शाळेत जाणे , पुस्तक वाचणे , फुटक्या पाटीवर धडे गिरविणे , पती – पत्नीने एकत्रितपणे फिरावयास जाणे , समुद्र किना-यावर फेरफटका मारणे हे सुद्धा समाजाच्या डोळ्यांत खुपत होते .
(गोपाळराव अलिबाग येथे पोष्टमास्तर असताना विरंगुळा म्हणून सायंकाळी उ भयता फिरावयास जात . , समुद्रावर देखिल फेरफटका मारीत. सुमारे १५० वर्षांंपूर्वी अलिबागच्या ब्राह्मणआळीत राहणा-या उभयतांवर
स्वजातवाल्यांकडूनही टीका झाली , आनंदीबाईंना तर नेहमीच “लक्ष” केले जात असे. पण ध्येय पूर्तीसाठी अ होरात्र धडपडणा-या आनंदीबाई तसूभरही ना उमेद झाल्या नाहीत . उलट त्या अधिक जोमाने अभ्यास करीत . गोर -गरिबांची व दलितांची आरोग्य विषयक सेवा करणे , जातीयवाद , रुढी -परंपरा व अंदश्रद्धां ना “मूठमाती” देण्यासाठी अनंत संकटाँना तोंड देत देत तसेच गरिबीचे चटके सोसत त्या सातासमुद्र पार करून *अमेरिकेस* गेल्या. तेथे सुप्रसिद्ध असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात गुणवात्तेवर प्रवेश मिळण्यासाठी अपार कष्ट घेतले . आरोग्यशास्त्रातील बारकावे जाणण्यासाठी पाठांतर केले . थिआॕसाॕफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॕडम ब्लाव्हाटस्की व कर्नल अल्काट यांचे मार्गदर्शन घेतले . त्यामुळे M. D. साठी सुप्रसिद्ध महाविद्यालयात प्रवेश मिळाला . अशाप्रकारे ध्येय प्राप्तीसाठी अर्धी लढाई जिंकली गेली . अमेरिकेची हवा मानवत नसताना , जेवणाची (शाकाहारी ) आबाळ हौत असताना , Home Sickness वर मात करून अभ्यास केला. प्राध्यापकांचे वैळोवेळी मार्गदर्शन घेतले . प्रयोगशाळेशी नियमित संपर्क ठेवला. महाविद्यालयातील एकही तासिका चुकविली नाही . वाह्यात मुलींपासून चार पावले दूर राहिली ” म्हणून
M, D. ही वैद्यकीय क्षेत्रातील अत्युच्च पदवी उत्तम गुणांनी संपादन करून *भारतातील पहिल्या महिला डाॕक्टर* हा किताब मिळविला. डाॕक्टर आनंदीबाई व गोपाळराव यांचे महिला उद्धाराचे काम
*महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले* यांच्या तोडीचे आहे.
*अलिबाग येथे बदली*
गोपाळराव जोशी पोष्टमास्तर होते . त्यांच्या सतत बदल्या होत असत. कल्याण येथे नोकरीचा शुभारंभ केल्यानंतर *अलिबाग* या जिल्हा मुख्यालयात त्यांची बदली झाली. येथे ते रुजू झाल्यानंतर चतुर्भुज हौण्याचा योग आला.ते बिजवर असल्यामुळे त्यांना वधू मिळणे दुरापास्त होते . पण कल्याण येथील गणपतराव अम्रुतेश्वर जोशी यांनी समाजाच्या रीति – रिवाजांकडे दु र्लक्ष करून (त्या काळात बिजवरास मुलगी देत नसत,) आपली मुलगी *यमुना* हीस गोपाळरावांना देण्याचे मान्य केले. गणपतरावांवर जाती बांधवांकडून टीकेची राळ उठली पण त्यांनी टीकेला भीक घातली नाही . यमुनाबाईंचे वय त्यावेळी १० – १२ वर्षांचे असेल. स्वजनांकडून टीकेचे
“लक्ष” ठरलेल्या या जोडप्यास पुत्रप्राप्ती झाली , त्यामुळे उभयतास अत्यानंद झाला. पण हा आनंद दीर्घ काळ टिकला नाही . ते बाळ अशक्त आसल्यामुळे सारखे आजारी पडत असे. अनेक प्रकारे उपचार केले गेले. पण व्यर्थ, शेवटी ते दगावले. उभयता दुःख सागरात बुडाले, नंतर त्यांना पुत्रप्राप्तीचा आनंद लुटता आला नाही . पण ते परदेशागमनाच्या ध्यैयापासून विचलीत झाले नाहीत .
: पत्नी सौ. आनंदीबाईस पुढील शिक्षण घेऊन दीन -दुबळ्यांची आरोग्यविषयक सेवा करण्याची संधी मिळण्यासाठी ते धडपडू लागले. त्यांच्या धडपडीस पत्नीची पूर्ण साथ होती .
त्यावैळी समाज पूर्ण बुरसटलेला होता . मुलींना शिक्षण द्यावयाचे नाही . त्यांनी उंबरठ्याबाहेर पडावयाचे नाही . चाकोरीतच राहावयाच्या सूचना वडीलधा-यांकडून दिल्या जात.पण गोपाळराव व आनंदीबाई चाकोरीबाहेर वागणारे होते . ध्येय प्राप्तीसाठी समाजाची कोणतीही बंधने पाळत नसत. अंधश्रद्धेला थारा नव्हता . हे दाँपत्य -विशेषतःः आनंदीबाई – टीकेचे “लक्ष” होते.
“टाकून” बोलणे , असहकार पुकारणे , टिंगल -टवाळी करणे , शैक्षणिक कामात अडथळा आणणे , खोटे आळ घेणे हे प्रकार अलिबागेत चालू होते . पण जोशी दांपत्याने तिकडे दुर्लक्ष केले ” . जिवाचे नाव शिवा ठेवून” वैद्यकीय विषयावरील पुस्तके वाचली , प्रयोग शाळेचा आसरा घेतला , वेळप्रसंगी ब्रिटिश तज्ञाःचा सल्ला घेतला , “पाद्री ” जनांशीही संपर्क साधला.कारण
“ईप्सित” पूर्ण करावयाचे होते इकडे
“आनंदीबाईनी पाद्री लोकांशी संबंध ठेवून धर्मांतर केले , हिंदू धर्म बाटविला ” इ. अफवा उठत होत्या . गोपाळरावांवरही अनेक आरोप केले गेले . पण उभयता आपल्या कामात मग्न राहिले .
*अमेरिकेत प्रयाण*
सुमारे १५० वर्षांपूर्वी जलद प्रवासाची साधने नव्हती . ” *जलमार्ग* हाच राजमार्ग ” होता . सातासमुद्र पार करणाऱ्याकडून *ख्रिश्चन धर्म* स्वीकारला जातो अशी भीती असल्यामुळे आनंदीबांना सनातन्यांकडून विरोध होता . सौ. आनंदीबाई या महिला ब्राह्मण होत्या. त्या काळात महिलांना परदेश गमनास मनाई होती . पोष्टमनच्या पगारावर सांसारिक खर्च भागविणे कठीण होते .अशा परिस्थितीत आनंदीबाईंसह गोपाळरावांनी अमेरिका वारी करणे परवडण्याजोगे नव्हते . म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील M. D, ही अत्युच्च पदवी संपादन करण्यासाठी सौ. आनंदीबाई एकट्याच अमेरिकेस निघाल्या. वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशगमन करणाऱ्या त्या पहिल्या *भारतीय*
(अलिबागकर ) महिला होत्या. पण त्यांच्या परदेशगमनावर अनेक शंका -कुशंका घेतल्या जात होत्या.
सौ. आनंदीबाईने पतिराजास शपथपूर्वक वचन दिले होते की *मी शेवटपर्यत “सौभाग्य” सांभाळणार , शाकाहारी भोजन घेणार , हिंदू धर्माची सर्व तत्वे सांभाळणार , उपास -तापास करणार , मानेवर सुरी ठेवली तरी हिंदू धर्म सोडणार नाही*
पतिराजास दिलेल्या वचनाचे पालन करताना सौ. आनंदीबाईंची दमछाक झाली . योग्यवेळी शाकाहारी जेवण न मिळाल्यामुळे प्रक्रुती ढासळली , आजार वाढले , आशक्तपणा आला , वैद्यकीय अभ्यासावर परिणाम झाला , नापास झाले तर ध्येय* अधुरे राहील म्हणून पतिराजास दिलेल्या ववचनाशी त्या शेवटपर्यत बांधील राहिल्या .”
त्या कट्टर धर्माभिमिनी व तेवढयाच प्रखर राष्ट्राभिमानी होत्या पाण्याचे बर्फात रुपाँतर होण्या इतपत. कडाक्याची थँडी. या कडाक्याच्या थंडीमुळेच मद्य प्राशनाचा छंद . पण कधीही आनंदीबाईनी मद्याच्या पेल्याला स्पर्श केला नाही . भारतीय संस्कृती शेवटपर्यंत जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
वैद्यक शास्त्रातील महत्त्वाची पदवी M, D, प्राप्त केल्यानंतर *मी मायदेशी (अलिबाग येथे ) जाणार , तेथील दीन -दुबळे आरोग्य सुविधै अभावी तसेच महागडी औषधे खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे रोग ग्रस्त बनून खाटेवर लोळत शेवटची घटका मोजतात अगर मध्येच *राम राम* म्हणतात . अशा दुबळ्यांची . सेवा करण्यासाठी रुग्णालय चालविणार , ” तेथे दारिद्रय रेषेखालील रुग्णांना प्राधान्य देऊन
*ना नफा ना तोटा* या तत्वावर सेवा देणार . भारतात विविध त-हेचे रोग फैलावत आहेत . व्यवस्थित रोग निदान होत नाही . खेडोपाडी तज्ञ डाॕक्टरांची वानवा आहे. म्हणून मुलींना वैद्यकीय व्यवसायाकडे वळण्याबाबत आवाहन करीन. तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमास प्राधान्य देऊन जनन – म्रुत्यूचा दर समसमान ठेवण्याचा प्रयत्न करीन.
अशाप्रकारचे नियोजन या विदूषीने अमेरिकेत वोद्यकीय शिक्षण घेताना केले. दारिद्रयाला तोंड देत विविध प्रकारच्या आजारांशी “सामना” करीत M. D, ही पदवी संपादन केली.आणि मोठ्या उत्साहाने व कल्पकतेने मायदेशीचा प्रवास जलमार्गे सुरू केला.पतिराजांच्या सहकार्याने सुखी व समाधानी संसार थाटण्याचे मांडेही मनात रचले. पण हाय – – – ? नियतीच्या मनात वेगळेच होते . डाॕक्टर आनंदीबाई मायदेशी परतत असताना आजारी पडल्या . दिवसेंदिवस त्यांचा आजार वाढत गेला. उपचार भरपूर केले गेले.
पण – – – – ? आनंदीबाई मायदेशी परतल्या. नंतर आजारावर त्वरित उपाय होण्यासाठी मुंबई – पुण्यातील नातेवाईकांकडे जाऊन

तेथील नामवंत डाॕक्टरांकडे उपचार घेण्याचे आयोजिले. .पण यम राजाने सापळा रचला व दि. २० फेब्रुवारी १८८७ रोजी त्यांची जीवनयात्रा संपविली.
( संदर्भ – कै, सौ. डाॕ . आनंदीबाई जोशी यांचे चरित्र . *लेखिका* –
काशीबाई कानिटकर)
*प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत परदेशगन करून M, D, झालेल्या पहिल्या भारतीय महिला ज्ञात होण्यासाठी हा लेख प्रपंच*

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 3 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे