Breaking
ब्रेकिंग

निर्मलनगर येथे ड्रेनेज लाईन अर्धवट , काहींना पिण्याचे पाणी मिळेना

रहिवाशांचा आक्रोश ,जगावे तरी कसे ? नागरिक संतप्त

0 3 9 0 2 7

निर्मलनगर येथे ड्रेनेज लाईन अर्धवट , पिण्याचे पाणी मिळेना

रहिवाशांचा आक्रोश ,जगावे तरी कसे ? नागरिक संतप्त

एस डब्ल्यु न्यूज ब्युरो रिपोर्ट

अहिल्यानगर : दि . २५ /  प्रभाग क्र .२ मधील निर्मलनगर भागातील हिम्मतनगरच्या गाडेकर चौक
गणेश मंदिरामागे गुरबल इंम्पेरीया या इमारती मधील सर्व रहिवासीयांनी त्यांना होणार त्रास ,अडचणी तसेच ड्रेनेज लाईन अर्धवट असल्याने येणारी दुर्गंधी आणि साधारण एक महिन्या पासून पिण्याचे पाणी नसल्याने या समस्यांना वैतागुन यासंबंधी अहिल्यानगर महानगर पालिकेचे मा . आयुक्त साहेब यांना निवेदन दिले आहे .

सदर निवेदनात म्हटले आहे की, आम्ही प्रभाग क्र . २ मध्ये गुरबल इंम्पेरीया, गणेश मंदिरा मागे, गाडेकर चौक, हिम्मतनगर, निर्मलनगर, सावेडी, अहिल्यानगर या इमारती मध्ये राहत आहोत. आमचे येथे गेले २० ते २५ दिवसांपासून महानगर पालिकेचे गाडेकर चौक येथील गणपती मंदिराचे मागील बाजू ते हिम्मतनगर पर्यंत रस्ता व ड्रेनेज लाईन चे काम चालू आहे. सदरील काम चालू असताना जे ठेकेदार आहेत यांचेकडून राहत असलेल्या इमारतीची पिण्याचे पाण्याची लाईन फुटली असल्याने गेले २० दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नाही तसेच संबंधीत विभागाकडून कार्यालयाकडून पिण्याचे पाण्याचे टँकर सुध्दा पुरवला गेला नसल्याने येथील रहिवाशांचे खूप हाल होत आहेत. इमारतीच्या प्रवेशद्वारावरील ड्रेनेज लाईन सुध्दा फुटली असल्याने इमारतीचे सर्व सांडपाणी व संडासचे पाणी रस्त्यावर व आजू बाजूच्या घरांमध्ये जात आहे. त्यामुळे, सदरील भागात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. येथे लहान मुले खेळत असताना रावसाहेब शिंदे यांचा मुलगा चेंबरच्या खड्ड्यात पडुन त्याला भयंकर दुखापत झाली आहे .

यामुळे संबंधीत ठेकेदाराला तुटलेले पिण्याचे पाण्याचे नळ व ड्रेनेजचे पाईप पुन्हा जोडून देण्यास सांगितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली व अर्धवट राहिलेल्या कामाची दुरुस्ती करणेसाठी लागणारे साहित्य आणणे कामी लागणारा सर्व खर्च व मजूरीची मागणी केली . परंतु सदरील काम हे संबंधीत प्रशासनाचे आहे तेव्हा या इमारतीची फुटलेली पिण्याच्या पाण्याची लाईन व ड्रेनेज लाईन त्वरीत दुरुस्त होवून मिळावी व आमची गैरसाय दुर व्हावी अशी विनंती येथील रहिवाशी नागरिक प्रसाद सुभाष जोशी, अशोक बारकू टिक्कल, किशोर कल्याणराव चव्हाण, आनंद धोंडीराम संचेती, सुबोध जगदीश पारखे,रावसाहेब काशिनाथ शिंदे आदि नागरिकांनी केली आहे .

संबंधीत प्रशासन यावर काही कार्यवाही करणार का ? निवेदनाची दखल घेवुन नागरिकांना दिलासा देणार का ? याची चर्चा मात्र नागरिकांमधुन होताना दिसत आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे