उद्धव ठाकरे साहेब , तुमचा शिवसैनिक अक्षरशः मरायला लागलाय …
एकनिष्ठेचे हेच फळ का ? - - विश्वनाथ देशमुख
उद्धव ठाकरे साहेब , तुमचा शिवसैनिक अक्षरशः मरायला लागलाय …
एकनिष्ठेचे हेच फळ का ? – –
विश्वनाथ देशमुख
प्रतिनिधी : संजय वायकर
विश्वनाथ देशमुख हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव चे रहिवासी असुन त्यांना दुर्मिळ आजाराने जखडले आहे . घरची अत्यंत गरिब परिस्थिती आहे . अनेक वर्षांपासून ते शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत . परंतु त्यांच्या आजारपणात सेनेच्या कोणत्याही पदाधिकारी व नेत्याने आर्थिक मदत केली नाही त्यांना मदत केली नाही .
विश्वनाथ देशमुख ओरडून सांगतायत कि , उद्धव ठाकरे साहेब तुमचा शिवसैनिक मरायला लागलाय … आता तरी मदत करा . मदत करा .
विश्वनाथ देशमुख म्हणतायत की, मी गेल्या २९ वर्षापासून शिवसेनेत कुठल्या ही पदाची अपेक्षा न ठेवता व घरची परिस्थिती हलाखीची असतांना देखील घरादाराचा विचार न करता शिवसेनेसाठी अहोरात्र प्रचार,विचार तळागाळा पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.परंतु गेल्या वर्षी आँक्टोंबर २०२३ पासुन मला मायस्थेनिया ग्रेविस नावाच्या दुर्मिळ आजाराने घेरले यामुळे माझ्या शरीराचे सर्वच अवयव कमजोर झाल्याने मला उठता,बसता,चालणे बंद झाले मी जवळपास दोन महिने छत्रपती संभाजीनगर येथे एम. जी.एम. हॉस्पीटल मध्ये ॲडमिट होऊन मृत्युशी झुंज देत होतो.घरची परिस्थिती बेताचीच असल्याने व कमविणारा कुटुंबातील मी एकटाच त्यातच महागड्या तपासण्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च लागणार होता अशा दुर्दैवी संकटात शिवसेनेने पाठीशी राहुन आर्थिक मदतीची अपेक्षा होती . परंतु तसे न होता शिवसेना उध्दव ठाकरे हिंगोली जिल्ह्याच्या एकाही नेत्याने,पदाधिकाऱ्याने माझी हॉस्पीटलला किंवा घरी येऊन दुरध्वनीव्दारे साधी चौकशी सुध्दा केली नाही . मी मृत्यशी झुंज देत असताना मला वाऱ्यावर सोडुन दिले . ही निष्ठावंत शिवसैनिकांसाठी लाजिरवाणी अन खेदाची बाब आहे.आज ही बेडरेस्टवरच आहे महिन्याला उपचारासाठी १२ हजार रुपये खर्च चालु आहे… आता कुठून आणू पैसे ? कसा करू पुढचा उपचार ? इतकी वर्षे एकनिष्ठ राहिल्याने पक्षाला आशिर्वाद देऊ की माझ्या वाईट काळात दुर्लक्ष करताय म्हणून शाप देऊ ?
मला आता पत्नी,मुलगा व मुलगी विचारतात अर्ध्या रात्री नेत्याचा फोन आला तर घरचा विचार न करता पळत होतात, मग अशा अडचणीच्या काळात तुमच्या आरोग्याची तब्येतीची साधी विचारपुस करण्यास आर्थिक मदत करण्यास सुद्धा का कुणी आले नाही…. ? एकनिष्ठेचे हेच फळ का? – – –विश्वनाथ देशमुख