मराठा सेवा संघाचा खान्देशस्तरिय वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न
मराठा सेवा संघाचा खान्देशस्तरिय वधु-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न
प्रतिनिधी :- पंकज पाटील
चाळीसगाव :- असंख्य विवाह जुळुन येत असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नावनोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सदर मेळाव्यासाठी खान्देशातील विविध मान्यवर लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित राहणार होते समाजबांधवांच्या सोयीसाठी वर्षभर ऑनलाईन नावनोंदणी करता यावी व स्थळ संशोधन करता यावे यासाठी “रेशीमगाठी मराठा मॅट्रिमोनी” या ऑनलाइनॲपचे देखील मान्यवरांच्या हस्ते आनावरण करण्यात आले .
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी जाहीर केले की ज्यांची तयारी असेल त्या जोडप्यांचा भव्यदिव्य असा अतिशय सुंदर सामुदायिक विवाह सोहळा चाळीसगाव येथे आयोजित करण्यात येईल.
समाजातील विवाह संदर्भात सुरू असलेल्या अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करण्यासंदर्भात व चांगल्या प्रथा सुरू करण्यासंदर्भात उदाहरणार्थ प्री-वेडिंग बंद करणे, विवाह वेळेवर लावणे, अक्षता म्हणून तांदूळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करणे किंवा टाळी वाजवणे,, कर्णकर्कश डीजेचा वापर टाळुन ध्वनी सेच प्लास्टिक प्रदूषण टाळणे आदी स्वरूपाचे ठराव समाज बांधवांनी एकमताने मंजूर केलेत.
तसेच यासंदर्भात व समाजातील अनिष्ठ प्रथा परंपरा संदर्भात प्रबोधनासाठी प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशीयांचे व्याख्यान झाले.त्यात सुर्यवंशी म्हणाले की खोटी प्रतिष्ठा सोडून विवेकी भूमिका घ्या…. डॉ.सदाशिव सुर्यवंशी
आज समाजात मुला मुलींच्या विवाहास व्यत्यय येताना दिसतात व पालकांपुढील सर्वात मोठी समस्या म्हणून उपवर मुलामुलींचे लग्न समोर दिसते. खान्देशातील सामाजिक परंपरांना अधिक घट्ट चिपकलेला समाज आर्थिक नुकसान करून बसतो आहे. आयुष्यभर आर्थिक विवंचनेत राहणारी पिढी विवाहाच्या चुकीच्या परंपरांमुळे राहताना दिसते आहे. दिवसेदिवस मुलींची संख्या कमी होत असून शहरी आकर्षण, अनावश्यक अपेक्षा, शेतीत काम न करण्याची इच्छा, व्यसनाधिनता, सामाजिक दबावगट, करीअरचे आकर्षण अशा असंख्य कारणांमुळे विवाहास अडथळे निर्माण होतात, यासाठी काही उपाय योजना देखील अंमलात आणने गरजेचे आहे. मुलाच्या बापाची संपत्ती न बघता मुलगा कमावता बघावा, होतकरू असावा, वयात लग्न करावे, निर्व्यसनी ,प्रामाणिक, कष्टाळू मुलगा बघावा व आवाक्यातील स्थळे बघावी, घर, शेती, प्लॉट विक्री करून अथवा कर्ज काढून खेाटी प्रतिष्ठा जोपासण्यासाठी अनाठायी खर्च न करता लग्न करावे. मेहंदी, प्री-वेडींग, मूळ लावणे, आहेर देणे-घेणे, दिवसातून देानदा लग्न लावणे अशा खर्चिक व जीवघेण्या प्रथा बंद करणे गरजेचे आहे. पालकांनी कुंडली किंवा गुण बघण्यापेक्षा शिक्षण, संस्कार अशा विधायक गोष्टी बघून विवाह घडवून आणावेत. अंधश्रघ्देवर विसंबून न राहता विवेकी भूमिका ठेवत मुला मुलींच्या विवाहप्रसंगी भविष्याचा विचार करावा व समंजस पध्दतीने संबंध जोपासावे. कारण पैसा, पॅकेज, हुंडा, पैशात व सोन्यात व्यवहार, वस्तू देवाण-घेवाण न करता कमीत कमी खर्चात व सार्वजनिक विवाह करावेत.
तसेच समाज बांधवांनी प्रतिसाद दिल्यास सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा पदाधिकाऱ्यांचा मानस आहे. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहून सुवर्णसंधीचा लाभ घेतल्या बद्दल अध्यक्ष पी एन पाटील, संदीप पाटील ,साहेबराव देसाई, विजयकुमार ढोबळे ,एस एम पाटील, बी ए पाटील ,सुनील पवार ,दिवाण पवार ,एच ओ पाटील, अनंत पाटील ,चंद्रशेखर भदाणे, उमेश शिंदे, नितीन पाटील रंगराव पाटील यांच्यासह मराठा सेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे. .
मेळाव्यास खालील प्रमाणे लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते .माजी आमदार बाबासाहेब राजवर्धन कदमबांडे मा खा सुभाष बाबा भामरे आमदार मंगेश दादा चव्हाण, उद्योजक बाळासाहेबांनी भदाणे, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, प्रा. आर ओ निकम,अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.चंद्रकांत पवार, प्र. समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, डॉ. योगेश ठाकरे, डॉ .राहुल बच्छाव, डॉ. चेतन पाटील, डॉ. पूनम पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष मध्य भारत सुनील महाजन, वधु वर कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरत येथील प्रकाश पाटील, खानदेश समन्वय समितीचे सुधीर पाटील,राम पवार, सुरेश पाटील सुरेंद्र पाटील प्रा. सुनील गरुड विलास पाटील बापूराव ठाकरे, उद्योजक किशोर पाटील, प्रा. टी पी शिंदे यांच्यासह विविध सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी विविध अधिकारी वधू वर व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .