स्नेहबंध’तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना सतरंजी भेट
‘स्नेहबंध’तर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांना सतरंजी भेट
अहिल्यानगर – स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने नेप्ती येथे आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्र व निवासी अपंग विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सतरंजी भेट दिली. याप्रसंगी स्नेहबंधचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, व्यवस्थापक काकासाहेब बारवकर, निशांत पानसरे आदी उपस्थित होते.
डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, आनंदऋषीजी अपंग कल्याण केंद्र व निवासी अपंग विद्यालयात गोर गरीबांची मुले शिक्षण घेत आहे. तर अंगी गुण असूनही केवळ आर्थिक परिस्थिती अभावी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे दुरापास्त होते. आता थंडी मोठ्या प्रमाणात जाणवू लागली आहे. थंडीपासून बचाव व्हावा यासाठी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सतरंजी भेट देण्यात आली. स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने आजवर बेघर, निराधार, कामगार, अनाथ गरजूंना छत्री, टोपी, कपड्यांचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रक्तदान शिबिर, अंध अपंगांना मदत, अनाथ आश्रमात जाऊन वाढदिवस साजरे करणे असे अनेक उपक्रम राबवले आहेत.
स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी करा यश मिळेल
विविध प्रकारच्या परिक्षेत यश संपादन करायचे असेल तर आत्मविश्वास, जिद्द आणि कठोर मेहनत करणे आवश्यक आहे स्वत:वर विश्वास ठेवून मनाची तयारी केली तर निश्चित यश प्राप्त होईल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार व वारसा पुढे चालवत शिक्षणामुळे आपण यशाचे शिखर गाठु शकतो. आई वडील यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करा, असे आवाहन डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.