फडणवीस सरकारने सत्ताकांक्षी रायगडला मंत्रीपदांचे भरभरून दान दिले
फडणवीस सरकारने सत्ताकांक्षी रायगडला मंत्रीपदांचे भरभरून दान दिले
अलिबाग / प्रतिनिधी : राजेश बाष्टे
देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रीपदाची संधी कोणाला संधी मिळणार , हा चर्चेचा विषय होता . आजच मत्र्यांची नावे जाहीर झाली आहेत . खातेवाटप व पालकमंंत्रिपद हा कटकटीचा विषय असून तो अद्याप गुलदस्त्यात आहे .
रायगड या दुर्लक्षित जिल्ह्यास एक नाही तर दोन मंत्रीपदे मिळाली आहैत, १९५२ पासून आजपर्यंतचा इतिहास पहता ही जिल्ह्यास लागलेली “लाॕटरीच” आहे. तरीही १९५२ ची विधानसभा व १९५२ ची लोकसभा पाहता त्याकाळात तत्कालीन “कुलाबा” जिल्ह्यास मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी व पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी यापेक्षा मोठे दान जिल्ह्याच्या पारड्यात टाकले *होते . अलिबाग विधानसभा* मतदारसंघातून कांग्रेस पक्षातर्फे निवडून गेलेले *नानासाहेब कुंटे* मुंबई विधानसभेचे *सभापती* झाले तर अलिबागचे दुसरे सुपुत्र *वामनराव लिमये* विधानपरिषदेचे *उपाध्यक्ष* झाले, सांविधानिकद्रुष्ट्या ही दोनही पदे अतिमहत्त्वाची आहेत . कारण मुख्यमंत्र्यांपेक्षा ती वरच्या क्रमांकाची आहेत. ही दोनही अतिमहत्त्वाची पदे तत्कालीन मागासलेल्या “कुलाबा” जिल्ह्यास मिळणे हे महद्भाग्य होय याच १९५२ साली ” कुलाबा” लोकसभा मतदारसंघातून “काँग्रेस ” पक्षातर्फे निवडून गेलेले *डाॕ. सी. डी. देशमुख* जवाहरलाल नेहरू मंत्रीमंडळात *अर्थमंत्री* झाले. हे जिल्ह्यास भूषणास्पद होते. *सी. डी.* नंतर ७२ वर्षांमध्ये *बॕ. अंतुले* फक्त केंद्रीय मंत्री झाले. अन्य कोणाला संधीच नाही .
महाराष्ट्र मंत्रीमंडळाचा विचार करता *दत्ता खानविलकर* काँग्रेस तर्फे राज्यमंत्री झाले. बॕ अंतुले राज्यमंत्री त्यानंतर मुख्यमंत्री झाले. रविंद्र राऊत राज्यमंत्री झाले. , बी. एल्. पाटील राज्यमंत्री झाले. रायगडचे सुपुत्र तथा शिवसेना नेते
* *मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले पण त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई होते . त्याचकाळात प्रभाकर मोरे (शिवसेना) राज्यमंत्री होते. ब-याच कालावधीनंतर आदिती तटकरे (राष्ट्रवादी)* दुस-यांदा मंत्रीपद भूषवीत आहेत . दुसरे नेते
* *भरतशेट गोगावले* (शिदे – शिवसेना) यांनाही मंत्रीपदाची लाँटरी लागल्यामुळे या दुर्लक्षित जिल्ह्याच्या वाट्यास दोन पूर्ण दर्जाची मंत्रीपदे आली आहेत . पलकमंत्रीपदाची महालाँटरी कोणाला लागते की उदय सामंतांसारखा परजिल्ह्यातील मंत्री (नाम. आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद न देता) पालकमंत्री नेमला जातो , हेपाहावयाचे. काहीही असले तरी दोन कँबिनेट मंत्रीपदे जिल्ह्यास मिळाली आहेत . हे जिल्ह्याचे भाग्य आहे. या मंत्री द्वयांनी रस्ते , पाणी , आरोग्य या खात्यांबाबत जिल्ह्याला झुकते माप द्यावे तसेच संधीचे सोने करावे ही विनंती . – – बळवंत वालेकर , ज्येष्ठ पत्रकार