Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना व शहरामध्ये कायदा हातात घेऊन धुडघूस घालण्या-यावर कारवाई करा – – -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राहुरी तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी

0 3 9 0 2 1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना व शहरामध्ये कायदा हातात घेऊन धुडघूस घालण्या-यावर कारवाई करा – – -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राहुरी तालुका पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी

राहुरी / एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क

राहुरी शहरामध्ये दिनांक 26/03/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची झालेली विटंबना ..

2) राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्याची विटंबना झालेनंतर ,दगडफेक,वाहनांची तोडफोड ,जातीय संघर्ष निर्माण होईल अशा घोषणाबाजी ,तीन तास रस्ता रोको ,टायर जाळणे, जनतेला मारहाण करणे ,बाटल्या फोडणे, झेंडा फाडणे, दुकाने बंद करण्यास भाग पाडणे, दंगल घडवण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करणे ,पोलीस अधिकाऱ्याला धक्का बुक्की करणे,पोलिसांना शिवीगाळ करणे ,धर्मिकतेच्या नावाखाली दहशत निर्माण करणे या प्रकारा बाबत कायदेशीर होणे करिता.

3) छत्रपती शिवाजी महाराजाची विटंबना करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात पोलीस प्रशासनाने योग्य कार्यवाही करणे व या प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार शोधून त्यांचे वरही कायदेशीर कार्यवाही करणे ..

मा.गृहमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना रि. पा.ई (आ) या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यासह विनम्र विनंती करण्यात येते की राहुरी शहरामध्ये दि. 26/03/2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचे अर्धकृती पुतळ्याची बुवाशिंदबाबा तालीम मध्ये विटंबनेच्या घटनेमुळे राहुरी शहरातील समाजिक एकोप्याला गालबोट लावून शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करण्याचा कट काही समाज कंठकांनी केलेमुळे राहुरी शहर काही काळ दंगल सदृश्य परिस्थितीला समोरे गेलेचे दिसून आले .अनेकांनी विटंबनेच्या आडून दंगल घडविण्याचे कट कारस्थान केलेचेही नागरीकांनी पाहिले आहे.समाजिक सलोखा राखणारे राहुरी हे एतिहासिक शहर आहे अनेक जातीचे धर्माचे लोक या शहरामध्ये एकोप्याने राहतात .या शहरामध्ये आज पर्यंत कोणतीही दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली नाही .जवळपास 50,000 लोकसंख्या असलेले राहुरी आहे हे पूर्णता समाजिक एकतेचे प्रतिक असताना काही समाज कंठकांनी दि 26 व 27 मार्च या रोजी शहरामध्ये दुकानांची तोडफोड,गाड्याच्या काचा फोडणे ,मारहाण करणे ,झेंडे फाडणे, टायर जळून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करणे ,तीन तास रस्ता रोकने,दहशत निर्माण करणे ,जातीय तेढ निर्माण होईल अशा धोषणाबाजी देणे.असा प्रकार काही समाजकंठकांनी केलेचे प्रसारमाध्यमातून व बातम्या मधूनही दाखवण्यात आल्याने कायदा सुवस्था बिघडणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करून त्यांच्या मुसक्या आवळणे प्रशासनाची जबाबदारी आहे परंतु पोलीस प्रशासन दबाव तंत्रामधे काम करत असल्याचे दिसून येते.पालकमंत्री म्हणतात की आरोपी पर्यंत पोलीस पोहचले पण कार्यवाही केली गेलेली नाही.झेंडा लावणाऱ्या युवकाचा व्हिडीओ प्रसारीत होऊनही पोलिसांनीअज्ञात व्यक्तीवर गुन्हा नोंदवून खरा प्रकार दडपिवण्याचा तर प्रकार केला नाही ना.जर आरोपी निश्चित असतील तर जनते समोर आणून त्यांना अटक केली गेली पाहिजे .राहुरी शहराची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेमुळे सर्वत्र शहर बदनाम करणाऱ्यांना पाठीशी घालू नका.त्यांनी कायदा हातात घेऊन दहशत निर्माण केली त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करून दंगल घडविणाऱ्याचा मनसुबा उधळून टाकण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे,आमचा समाज हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून आपल्या प्रणांची बाजी लावून छत्रपती घराण्याचे रक्षणच करत आलेला आहे.रायप्पा महार या महापुरुषांनी छत्रपतींच्या रक्षणासाठी आपले प्राणाची आहुती दिली,त्या महापुरुषांचे आम्ही वंशज आहोत.या शहराचे नाव आम्ही कदापि खराब होऊ देणार नाही ,परंतु पोलीस प्रशासनाने दंगली घडविणारे तसेच विटंबना करणारे समाज कंठक यांचा शोध घेऊन या प्रकरणाची सखोल चोकशी करून या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शोधून या सर्वांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी ,बाहेरील शक्ती राहुरी शहर अशांत करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना अटकावं करावा,गृहमंत्री साहेब राहुरी शहर शांतता प्रिय व समाजिक सलोखा जपणारे शहर असून ज्या समाज कंठकांनी सदर घटना घडवून आणल्या आहेत त्यांचे वर कठोर कार्यवाही व सखोल चौकशी करण्याबाबत आपण पोलीस प्रशासनाला योग्य आदेश देण्यात यावे समाजाच्या भावनांचा विचार करून दोषीवर कठोर कार्यवाही करण्यात यावी ही विनंती…

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे