बेघर, निराधारांच्या अन्नादानामुळे आनंदाचा प्रकाश : डॉ. उद्धव शिंदे
स्नेहबंधतर्फे मानवसेवा प्रकल्पात अन्नदान
प्रतिनिधी : महेश चव्हाण
अहिल्यानगर दि . ७ / ज्यावेळी खऱ्या भुकेल्याला, निराधाराला, पिडीतांना कोणत्याही आमंत्रणाशिवाय दोन घास प्रेमाचे मिळेल ते खरे अन्नदान होय. समाजापासून दुरावलेल्या वंचितांना पून्हा माणुस म्हणून समाजात उभं करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मानवसेवा प्रकल्पातील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आणि परिस्थितीमुळे संघर्षमय जीवन जगणाऱ्यांच्या जीवनात या अन्नादानामुळे आनंदाचा प्रकाश निर्माण करु शकलो, असे प्रतिपादन स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले. बेघर, निराधार, पिडीत मनोरुग्ण महिला व बंधूंच्या उपचार आणि पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव रोड येथील मानवसेवा प्रकल्पात स्नेहबंध सोशल फौंडेशनच्या वतीने अन्नदान देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे सचिव दिलीप गुंजाळ, अमोल बास्कर आदी उपस्थित होते. डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, मानसेवा प्रकल्पात ज्यांना समाजाने नाकारलं, हेटाळलं त्या निराधार पिडीत मानसिक विकलांगांना आधार देण्याचे कार्य माहोत आहे. या मानवसेवेच्या कार्यात सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. आजकाल एक नवीन संस्कृती पुढे येत आहे. सण, समारंभ किंवा निवडणुकीच्या काळात शामियाने उभारून जेवणावळी दिली जाते. त्यालाच काही लोक अन्नदान असे म्हणतात. पण या अन्नदान कार्यक्रमात किती बेघर, अन्नापासून वंचित असणारे लोक जेवतात याचाही आपण विचार केला पाहिजे. या जेवणावळीत बहुतेक करुन आपले नातेवाईक आप्तेष्ठ व मित्र परिवारच असतो. याला आपण फारतर नव्या संकल्पनेनुसार गेट टुगेदर असे म्हणता येईल.