आमदारकीला इच्छुक असणारे खासदारांच्या पक्षात जाण्यासाठी उत्सुक ?
शरद पवार गट शहराध्यक्षांचा पदाचा राजीनामा

आमदारकीला इच्छुक असणारे खासदारांच्या पक्षात जाण्यासाठी उत्सुक ?
शरद पवार गट शहराध्यक्षांचा पदाचा राजीनामा
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर येथील पक्षातील काही लोकांकडून अडवणूक होत असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी आपल्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान अमळनेरातून आमदारकीला इच्छुक असणारे तीन जण खासदारांच्या भाजप मध्ये जाण्याची चर्चा असून काही जण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. भाजप मधील खदखद देखील बाहेर येण्याची शक्यता आहे.सामान्य नागरिकांच्या हिताची कामे करत शेतकरी महिला विद्यार्थी आदींच्या प्रश्नावर आंदोलने करून पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. मात्र पक्षातीलच काही लोकांकडून कार्यकर्त्यांची अडवणूक होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे असे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांना दिलेल्या राजीनामा पत्रात श्याम पाटील यांनी म्हटले आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला असता त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असे सांगितले.दरम्यान अमळनेर तालुक्यातील आमदारकीला इच्छुक असणाऱ्या चार नेत्यांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. तर भाजप मध्ये देखील खदखद सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. शरद पवार गटातून काही जण अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता असून तशी तयारी सुरू असल्याचे समजते. तर शरद पवार गटातून व काँग्रेसमधून काही जण भाजप कडे जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचा प्रवेश होणार होता. मात्र तांत्रिक कारणास्तव प्रवेश लांबला असून लवकरच केला जाणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. भाजप ने देखील आपल्या कार्यकारिणीची रचना बदलली असून दोन तालुकाध्यक्ष ,दोन शहराध्यक्ष देऊन पदांचे विकेंद्रीकरण करून जबाबदारी वाटून नव्याना देण्यात आली आहे. त्यामुळे काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. ही खदखद सोशलमीडियावर व्यक्त केली जात आहे.yराज्यात मुख्यमंत्री भाजप चे फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यामुळे आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणूक यासाठी उमेदवारी विविध समित्या मंडळे , ठेकेदारीसाठी निधी मिळावा यांचा सारासार विचार करता अजित पवार गट आणि भाजप कडे ओढ सुरू झाली आहे. याठिकाणी देखील आपले महत्व कमी होईल म्हणून काही जुन्या कार्यकर्त्यांनी आपले महत्व कमी होईल म्हणून विरोधकांना प्रवेश देऊ नये अशी आग्रही भूमिका घेतली आहे.