प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे जनतेच्या प्रश्नांसाठी जनजागृतीचे आवाहन

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे जनतेच्या प्रश्नांसाठी जनजागृतीचे आवाहन
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडेदिनांक 29 मे 2025 रोजी मुंबई कुलाबा येथील काँग्रेस मुख्यालय गांधी भवन येथे जळगाव जिल्हा काँग्रेस सरचिटणीस संदीप घोरपडे यांनी विविध पक्षातून भाजपाकडे धाव घेणारे नेते कार्यकर्ते व जळगाव जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून माहिती दिली यावर प्रदेशाध्यक्षांनी साऱ्या राजकीय घडामोडी व जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील प्रलंबित तसेच सद्यस्थितीतील प्रश्नांना तडीस लावण्यासाठी जनजागृती चे आवाहन केले
महाराष्ट्र राज्यात सत्ताकांक्षी नेते तथा स्वार्थी कार्यकर्ते या ना त्या मार्गाने सत्ते जवळ जाण्यासाठी आपापले पक्ष सोडून महायुतीकडे धाव घेताना दिसत आहेत ते फक्त वैयक्तिक अथवा कुटुंबाचा स्वार्थ साधण्यासाठीच मात्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष स्वातंत्र्यपूर्व काळापासून सामुहिक हिताचा विचार करतो तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात महिला वंचित पिढी त्यांना आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो व या कामासाठी काँग्रेस नेते व कार्यकर्ते पक्ष धोरणाच्या अंमलबजावणीसाठी धडपडत असतात
त्याच अनुषंगाने संदीप घोरपडे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांना जिल्ह्याचा राजकीय सामाजिक तसेच सांस्कृतिक आढावा देताना चोपडा यावल रावेर येथील आदिवासी बांधवांना आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे भोगाव्या लागणाऱ्या यातना तसेच वन विभागाच्या गलथान कारभारामुळे वनजमिनींचे वर्षानुवर्ष रेंगाळत असलेले हस्तांतरण आदिवासी विभागातील भ्रष्टाचारास खतपाणी घालणारे अधिकारी कर्मचारी यामुळे आदिवासी बांधवांच्या प्रगतीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे भुसावळ आणि जळगाव शहराचा बकालपणा वाढती गुन्हेगारी विविध सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मजुरी त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे होणारे हाल यासह चाळीसगाव पाचोरा भडगाव येथील बेरोजगारीचा प्रश्न व त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना अजिबातच नसलेले भान अमळनेर पारोळा एरंडोल येथील अवर्षण प्रवण भागातील सिंचनाचा प्रश्न शेतकरी कष्टकरी कामकारी यांच्या कष्टाचे न होणारे मोल शेतीमालाच्या हमीभावाची काळजी नसणे तसेच कृषी विभागाचा आणि शेतकऱ्यांचा अजिबात नसलेला संपर्क सर्वसामान्यांच्या हातातून अलगद सुटू पाहणारे शिक्षण बेरोजगारीमुळे तरुणांच्या लग्नाचे वाढणारे वय त्यामुळे होणारे गैरप्रकार महिलांची असुरक्षितता यासह ढासळू पाहणारा सामाजिक समतोल वाढती महागाई जाती जाती धर्माधर्मात वाढणारी तेढ या सगळ्या विषयांना जनतेने अत्यंत तन्मयतेने समजून घ्यावे व ते समजविण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन जनजागृतीचे अभियान राबवावे असे प्रतिपादन केले
त्यानंतर चाळीसगाव आणि एरंडोल येथील नाट्यगृहा निर्मितीचा प्रश्न देखील सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाचा विषय आहे कारण सध्या अत्यंत बेजबाबदार राज्य सरकार केंद्र सरकार यांवर सांस्कृतिक चळवळीतून कलावंत नेमकेपणाने सत्ताधाऱ्यांच्या विकृतीवर बोट ठेवतात परंतु महायुती अशा लेखक कवी गायक कलावंत बुद्धिवंत विचारवंत यांची गळचेपी करून पाहत आहे अशा कलावंतांना पाठबळ देण्यासाठी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे हर्षवर्धनजी सपकाळ संदीप घोरपडे अतुल लोंढे यांनी भेट दिली असता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिराचे संचालक सावंत यांनी त्यांचे स्वागत केले व तेथे नाट्य निर्माते वितरक नाट्य संस्था व नाट्यगृह चालकांमध्ये समन्वय साधता येईल अशा बैठकीची सूचना केली त्यातून सांस्कृतिक क्षेत्रात अधिक उत्तम मार्ग निघू शकतील असे सांगून कलावंतांना धीर दिला .