विद्यार्थीभिमूख उपक्रम राबविण्यात आडसूळ पॉलिटेक्निक आग्रेसर.- डॉ. संभाजी पठारे

विद्यार्थीभिमूख उपक्रम राबविण्यात आडसूळ पॉलिटेक्निक आग्रेसर.- डॉ. संभाजी पठारे
एस डब्ल्यू न्यूज / नेटवर्क
सौ. सुंदराबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक चास अहिल्यानगर येथे विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. अनिरुद्ध आडसूळ, संस्थेच्या सेक्रेटरी सौ. लीना आडसूळ, संस्थेचे डायरेक्टर मा. कृष्णा आडसूळ, संस्थेचे खजिनदार मा. परमेश्वर आडसूळ या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आडसूळ इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे , टेक्निकल कॅम्पस चे प्राचार्य आणि डायरेक्टर डॉ. प्रदीप पाटील, फार्मसीचे प्राचार्य डॉ. धनंजय लांडगे, डॉ. संदेश वायाळ, होता डॉ. प्रदीप पंडित आणि टेक्निकचे
प्राचार्य आर. एस. गडाख, प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख प्रा.जगधने एम के., विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. पवळे एस. एस. उपस्थीत होते.
महाविद्यालयाच्या प्रथेप्रमाणे राष्ट्रगीत व दीप प्रज्वलानाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
प्रा.जगधने भारत सरकारचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे तात्कालीन सचिव थोर शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांच्या प्रयत्नातून १९८७ ला २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभर घोषित करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे वैशिष्ट्य म्हणजे नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या भौतीकशास्त्रातील ‘रामन परिणाम’ हे संशोधन २८ फेब्रुवारी १९२८ रोजी जाहीर झाले तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभर साजरा होत असल्याचे आपल्या प्रास्ताविकात प्रा. जगधने एम. के. यांनी सांगितले. तंत्र शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना लक्षात घेऊन त्याचं सतत मनन व चिंतन अविरतपणे करून प्रत्यक्षात त्या संकल्पनांचं तंत्रज्ञानामध्ये उपयोजन करून अत्याधुनिक व वैशिष्ट्यपूर्ण यंत्रसामग्री निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. अशा कार्यक्रमातून प्रेरणा घेऊनच विद्यार्थी घडत असतात म्हणून अंगीभुत असलेले गुण जागृत करून त्यांना अशा प्रकारच्या प्रेरणादायी कार्यक्रमात प्रत्यक्षरीत्या सहभागी करण्याचं काम हे पॉलिटेक्निक सातत्याने करत आलेले आहे व करत राहील यातूनच प्रेरणा घेऊन काही यशस्वी अभियंते व शास्त्रज्ञ यामधून निर्माण होतील याबाबत शंका नाही असे प्रतिपादन पॉलिटेक्निकचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना खास बौद्धिक पर्वणी ठरली ते म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभलेले आडसूळ कम्प्युटर इन्स्टिट्यूट अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य व स्वतः संशोधक असलेले डॉ. संभाजी पठारे यांचे व्याख्यान. डॉ. संभाजी पठारे यांनी विद्यार्थ्यांना विस्तृत मार्गदर्शन करताना सांगितले की ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी भारतातील ‘रामन इफेक्ट’ चा शोध लावला व संशोधन विश्वातले अतिउच्च मानले जाणारे नोबेल पुरस्काराचे ते मानकरी ठरले. डॉ. सी. व्ही. रमण यांचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन व विज्ञान विषयक जागरूकता समाजात निर्माण करण्यासाठी देशभर ‘राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. मानव जीवनाच्या प्रगतीमध्ये विज्ञानाचे असलेले अनन्य साधारण महत्त्व असून जे प्रगत देश आहेत त्या देशांचा विकासाचा दर हा तेथील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासावरती अवलंबून असतो. विज्ञानामध्ये लागलेला एक शोध हा असाह्य झालेलं जीवन सुसह्य करण्यास कसा उपयुक्त ठरतो याचे उदाहरण देण्यासाठी लुई पाश्चर, थॉमस अल्वा एडिसन, मादाम क्युरी या सारख्या थोर शास्त्रज्ञांचे दाखले देऊन त्यांचे चरित्र वाचण्यास विद्यार्थ्यांना उद्युक्त केले. प्राचार्य डॉ. संभाजी पठारे यांनी आपण स्वतः केलेल्या समाज विधायक संशोधनाचे व इस्त्राईल दौऱ्याचे मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या वर्णनाने विद्यार्थी भारावून गेले.
प्रसंगी विद्युत अभियांत्रिकीचे विभाग प्रमुख प्रा. सुनील पवळे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा.महेंद्र जाधव, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशनच्या विभाग प्रमुख प्रा. सोनाली पाळंदे, संगणक विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता होले, स्थापत्य अभियांत्रिकीच्या विभाग प्रमुख प्रा.आकांक्षा म्हस्के, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या रमनानी व राजेश्वरी कड्याळ या विद्यार्थिनीने केले तर आभार प्रदर्शन प्रा. मोहिनी देशमुख यानी केले.