Breaking
ब्रेकिंग

राहुरीत १६ जुन आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त जनजागृती हक्क परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

राहुरीत १६ जुन आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त जनजागृती हक्क परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

0 4 3 3 2 5

राहुरीत १६ जुन आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त जनजागृती हक्क परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

राहुरी तालुका / विशेष प्रतिनिधी : जावेद शेख

16 जून आंतरराष्ट्रीय घरकामगार दिन अहिल्यानगर राहुरी येथे मोठ्या उत्साहात घरकामगार महिलांनी साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सार्वमथंन वर्तमानपत्राचे उपसंपादक संजयजी संसारे व माजी प्रशासकीय अधिकारी मान. शिरीष गायकवाड हे उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व शाल देऊन घरकामगार युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्तावना जिल्हा समन्वयक संदीप कोकाटे यांनी केली महाराष्ट्रात व देशपातळीवर घरकामगारांचा संघर्ष व सध्या केंद्रीय कायद्याची कृतिशील कारवाई बाबत ऐतिहासिक संदर्भ देत वर्तमानकाळात घरकामगारांच्या हक्कासाठी कायद्यात तरतूद व्हावी म्हणून सकारात्मक भूमिका सांगितली जनजागृती हक्क परिषद मूलभूत जागृती आणि घर कामगारांना सन्मान मिळण्यासाठी कायद्याचे रक्षण मिळण्यासाठी हक्क परिषदेचे आयोजन केले आहे असे स्पष्ट केले. 16 जून जागतिक घर कामगार दिनानिमित्त अहिल्या नगर जिल्ह्यातून पोस्ट कार्ड कॅम्पेन महिलांनी लिहून भारत सरकारला पाठवले आहेत तसेच स्टिकर पोस्ट द्वारे विविध अहिल्यानगर राहुरी शहर श्रीरामपूर प्रमुख भागात पोस्टरद्वारे घरकामगारांच्या हक्कासाठी जनजागृती केली आहे. पत्रकार परिषदेमार्फत प्रमुख मागण्यांची दखल शासनाला घेण्यास जागृती केली आहे तसेच लोकप्रतिनिधी यांना लेखी निवेदन देऊन आमच्या मागण्या मंजूर कराव्यात असेही कळविले आहे असे हक्क परिषदेत स्पष्ट मत व्यक्त केले. घरकामगारांच्या वतीने महाराष्ट्र राज्य युनियन सदस्य वर्षाताई बाचकर यांनी घरकामगारांच्या राज्यात व देशात सुरू असलेली कायदेशीर लढाई आणि संघटनात्मक भूमिका सांगितली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संजय संसार यांनी कामगार कायदा, संविधान आणि कल्याण बोर्ड नोंदणी बाबत सकारात्मक मत व्यक्त केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून असलेले मान. शिरीष गायकवाड यांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा सर्व महिलांनी एकजुटीने कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कृतिशील हक्कासाठी कल्याण बोर्ड नोंदणी जास्त करा गरजेचं आहे शासकीय नोंदणी करून शासनाला मूलभूत हक्कासाठी कायदा करण्यास भाग पाडणे महत्त्वाचे आहे आणि त्याकडे वाटचाल सुरू आहे म्हणून आम्ही समाजाप्रती आपल्या घरकामगारांच्यासोबत आहोत असे सांगितले, घर कामगारांना सन्मान मिळाला पाहिजे मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजेत असेही मत व्यक्त केले, संविधानिक मार्गाने घरकाम केल्यामुळे भारतीय लोकशाही मजबूत होत आहे आणि झाली आहे असे त्यांनी स्पष्ट मत मांडले हक्क परिषदेतून ज्या काही प्रमुख मागण्या आपण शासनाला आणि समाजाला जाहीर केले आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे त्याच्या सोबत आम्ही आहोत असेही स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आभार जानकाताई नारद व अलमास पठाण यांनी व्यक्त केले तसेच हक्क परिषदेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील घरकामगारांची भूमिका व समाजात जागृती करण्याबाबत मनोगत काही लीडर्स घरकामगारांनी व्यक्त केली. जनजागृती हक्क परिषदेसाठी जानका नारद,वर्षाताई बाचकर, प्रियंका मेहेत्रे, हसीना इनामदार, गीता कवडे, सुनंदा शेवरे,मंगल झांबरे, उमा लघे,सना शेख, रेश्मा शेख, सुवर्णा जगधने, सीमा भागवत, सुजाता जाधव आदी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध प्रमुख भागातील घरकामगार महिला सहभागी झाल्या होत्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे