नगाव गावावातील गटारीच्या घाणीमुळे नागरीकांचा आरोग्यांचा प्रश्न ऐरणीवर

नगाव गावावातील गटारीच्या घाणीमुळे नागरीकांचा आरोग्यांचा प्रश्न ऐरणीवर
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
जळगाव :- अमळनेर तालुक्यातील नगाव येथील गटारी कचरा व घाणीने यात पाणी साचल्याने आता नागरीकांचा आरोग्यांचा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील नागरिकांच्या सांगण्यावरुन व जागरुकता यामुळे हा गटार घाणीचा प्रश्न समोर आल असुन यावरुन लक्षात येते की ग्रामपंचायत यावर लवकरात लवकर काय कार्यवाही करेल यांची नागरीकांमध्ये चर्चा सुरु आहे.कारण एप्रिल महिन्यात सुध्दा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळेस नगाव बुद्रुक येथील सामान्य नागरिकांने तक्रार केली असता काहीच कार्यवाही झाली नाही.
आता तर अवकाळी पाऊस पडत असून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करुन देखील काहिच झालेले नाही.आता जनसामान्य नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आहे.नागरिकांचे म्हणणानुसार जर कार्यवाही होत नसेल तर मग नागरिकांनी पुढिल पाऊल उचलण्याची तयारी ठेवली आहे.