Breaking
ब्रेकिंग

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळेच बेछुट आरोपांची राळ व संभ्रम पसरवण्याचे काम सुरू:- जि. प. सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांचा हल्लाबोल

0 3 9 0 4 0

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली त्यामुळेच बेछुट आरोपांची राळ व संभ्रम पसरवण्याचे काम सुरू:- जि. प. सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांचा हल्लाबोल

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १२/ आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिनांक २ एप्रिल ला अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्या बरोबर ३ तारखेला माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनल च्या प्रचाराचा शुभारंभ झाला असून या पॅनलने प्रचारांमध्ये आघाडी घेतली आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे सारखे दूरदृष्टी असलेले नेतृत्व, साखर कारखानदारीचा दांडगा अनुभव, संपूर्ण जिल्ह्यामध्ये पारदर्शक कारभार करून उच्चांकी दर देणारे शिंदे बंधू यांचा नावलौकिक, महायुती सरकारशी असलेले संजयमामा शिंदे यांचे नातेसंबंध तसेच देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे शिलेदार म्हणून गणेश चिवटे आणि महेश चिवटे यांनी घेतलेली प्रचारातील आघाडी, संजयमामा शिंदे हेच फक्त आदिनाथ साखर कारखाना सुरू करू शकता याबद्दल सभासदांच्या मनामध्ये असलेली विश्वासार्हता, राजकीय गटातटाच्या पलीकडे जाऊन प्रचार सभांना सभासदांचा वाढता प्रतिसाद पाहता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यामुळेच बेछूट आरोपांची राळ विरोधकांकडून उडवली जात आहे. विरोधकांनी प्रचारात अतिशय खालची पातळी गाठली असून आता संजयमामा शिंदे यांच्या प्रचारादरम्यान बोललेल्या क्लिप अर्धवट व मिक्स करून सभासदांमध्ये संभ्रम पसरवण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. परंतु विरोधकांचे हे सर्व मनसुबे सभासद उध्वस्त करणार असून येत्या 17 तारखेला माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चांगल्या मताधिक्याने निवडून देतील असा विश्वास वांगी जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य निळकंठ आप्पा देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे