*रिधोरे ग्रामपंचायत येथे हिंदू साम्राज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा; नशा मुक्त व सशक्त भारत अभियानचे ब्रँड अ़ॅम्बेसेडर महेश वैद्य यांचे उपस्थितांना मार्गदर्शन*
*रिधोरे ग्रामपंचायत येथे हिंदू साम्राज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा; नशा मुक्त व सशक्त भारत अभियानचे ब्रँड अ़ॅम्बेसेडर महेश वैद्य यांचे उपस्थितांना मार्गदर्शन*
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १७/ रिधोरे ग्रामपंचायत तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे हिंदू साम्राज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नशा मुक्त भारत अभियान चे ब्रँड ॲम्बेसेडर आणि सशक्त भारत अभियान चे प्रशिक्षक महेश वैद्य यांनी उपस्थितीना मार्गदर्शन केले.
छत्रपती शिवरायांनी जसे त्याकाळी सर्व हिंदू समाजाला संघटित करून बलवान करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली त्यासाठी त्यांनी प्रथम स्वकीयचा बंदोबस्त केला आणि मुघलांच्या छाताडावर पाय ठेवून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.
त्यांना आपण आदर्श मानतो छत्रपती शिवराय हे आपले प्रेरणास्थान आहेत, पण त्यांना अपेक्षित असा भारत आणि महाराष्ट्र आपण केव्हा बनवणार? आजचे सामाजिक प्रश्न खूप वेगळे आहेत. आज देखील हिंदूंना जातीपातीत वाटण्याचे काम सुरू आहे वेळीच सर्व हिंदू बांधवांनी संघटित होऊन काळाची पावले ओळखली पाहिजेत. तसेच छत्रपती शिवरायांना अपेक्षित असा महाराष्ट्र म्हणजेच व्यसनमुक्त आणि सशक्त म्हणजेच बलवान महाराष्ट्र बनवूया हीच खरी शिवरायांना मानवंदना ठरेल. यासाठी समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन नशा मुक्त महाराष्ट्र तसेच सशक्त महाराष्ट्र बनवूया असे वक्तव्य यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महेश वैद्य यांनी केले.