
निर्मलनगर च्या रहिवाशांनी अनुभवला ‘छावा ‘ चित्रपट
निर्मलनगर प्रतिष्ठाणचा कौतुकास्पद उपक्रम
एस डब्ल्यू न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेले बलिदान हे महाराष्ट्रातील मावळा माणूस कधीही विसरू शकणार नाही . संपूर्ण महाराष्ट्रात धर्म वाढविणारा छावा चित्रपट सगळीकडे लोकप्रिय ठरत असून दि . ३ मार्च रोजी निर्मलनगर येथील स्थानीक युवक, महिला भगिणी आणि नागरिकांनी एकत्रितपणे ‘छावा ‘ चित्रपट पाहिला. छावा चित्रपट पाहुन सर्व नागरिक भारावून गेले .
निर्मलनगर प्रतिष्ठाण च्या वतीने गाडेकर चौक येथे गणपती मंदिरासमोर हा चित्रपट दाखवण्यात आला .
प्रभागातील मा . नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते गणपतीची आरती संपन्न झाली . यावेळी वारे यांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती देऊन त्यांचा इतिहास उपस्थित नागरिकांना अवगत करून दिला . निर्मलनगर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष अजय हिवाळे यांनी चित्रपटा विषयी माहिती दिली .यावेळी तरुण, विद्यार्थी, वृद्ध, महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र धर्माची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची महती सांगणाऱ्या या चित्रपटाची सर्वत्र मोठी मागणी आहे.महाराष्ट्र हा सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध युद्ध छेडले. स्वतः औरंगजेब बादशहा महाराष्ट्रावर चाल करून आला. मात्र तरीही त्याला स्वराज्य जिंकता आले नाही. धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले.