नगरपालिका वाऱ्यावर ; CO साहेब मस्त जनता त्रस्त

नगरपालिका वाऱ्यावर ; CO साहेब मस्त जनता त्रस्त
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरात नगरपालिकेचे एकीकडे अतिक्रम काढणे सुरु असुन दूसरीकडे जनता त्रस्त झाली
आहे. शहरातील अतिक्रम कानाही सर्व प्रश्न मार्गी लागणार नाही. त्यासाठी जनतेचे देखील कामे करावी लागतील. अतिक्रमण काढत असताना जनतेच्या देखील विचार केला पाहिजे. कारण या सर्व मुळे जनता रस्त्यावर येते. नगरपालिकेत चार्जिंग स्टेशन आजही बंद अवस्थेत पडलेले आहे. असे अनेक प्रश्न आहेत.
दररोज काही ना काही होत आहे मग नगरपालिक चे Co काय करत आहेत. रस्त्यांच्या कामामुळे अनेक भागात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. तरी देखील त्यावर उपाय केले जात नाही आहे. रस्त्यांची कामे होत असल्यामुळे आताच काही दिवसापूर्वी मुंदडा नगर भागात पाईपलाईन फुटली. उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे त्याची पाण्याची आवश्यकता जास्त असते. अशातच पाईपलाईन फुटली असेल सर्वसामान्य नागरिकांनी पाणी कुठून आणावे. विद्या विहार येथील सामाजिक कार्यकर्ते रवीभाऊ यांनी देखील याविषयी तक्रार केलेली होती. अजून नाही त्याच्यावर कारवाई झालेली नाही. मग नगरपालिका काय करत आहे. सी ओ साहेबांना फोन करून देखील काही उपयोग झालेला नाही. या समस्येवर नगरपालिकेने लवकरात लवकर उपाययोजना करावी जनतेचे प्रश्न मार्गी लावावे.
*सामाजिक कार्यकर्ते रवी भाऊ यांनी स्वतः याबाबत माहिती दिली* मुंदडा नगर पाण्याच्या टाकीचा पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसांनी होत आहे या कडे नगरपरिषदेने लक्ष देऊन नियोजन केले पाहिजे मुंदडा नगर मधील रस्त्याच्या कामात ठेकेदाराने पाईपलाईन फोडली असून संबंधित ठेकेदार आजपर्यंत कोणती ही कार्यवाही झालेली नाही सामान्य जनतेने कुठे जावे. कुणाकडे दाद मागावी. तरी नगरपालिका प्रशासनाने याचा विचार करून हे सर्व प्रश्न मार्गी लावावे.अनेक भागात कचरा गाडी सुद्धा दोन तीन दिवस येत नाही.