कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. . .
कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. . .
इंदापूर / विशेष प्रतिनिधी
इंदापूर : इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथे इंदापूर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
इंदापूर महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली विविध उपक्रम राबविले जातात .आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी महाविद्यालयातील विद्यार्थी विकास मंडळ, राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महाविद्यालयात अभिवावादन करण्यात आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे विज्ञान शाखाप्रमुख डॉ . शिवाजी वीर विद्यार्थी विकास मंडळाचे डॉ . तानाजी कसबे एन एस एस विभागचे प्रा.उत्तम माने परीक्षा विभागप्रमुख प्रा . फलफले एन. आणि महाविद्यालयातील इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी असे सर्वजण उपस्थित होते .यावेळी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी डॉ. दिंगबर बिरादार यांनी मनोगत सादर केली या प्रा बिरादार यांनी संविधान व सांविधान निर्मिती ची प्रकिया या मध्ये बाबासाहेबांनी घेतलेल्या प्रयत्नाचा व त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला . डॉ.प्रज्ञा लामतुरे यांनी संविधानामुळे सर्वसामान्य माणसाला हा हाक्क मिळल्याचे सांगितले . तसेच प्राचीन काळापासून महिलांवर होणाऱ्या अन्यायला दूर करण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रथमतः घेतले जाते असे सांगितले . डॉ. आंबेडकर यांनी महिलांना हाक्क व सामाजिक दर्जा मिळवा या साठी घटनात्मक तरतुद केलेली आहे. याची जाणीव करून दिली .यावेळी प्राचार्य डॉ जीवन सरवदे यांनी सांविधाना तील समता बंधुता व न्याय या तत्वानी प्रत्येकाला विकासाची संधी मिळाली आहे . तसेच कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासासाठी अंतर्गत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घटनात्मक कायदे उपयोगी ठरतात असे सांगितले . डॉ. शिवजी वीर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व .त्यांच्या सहकार्यानी अहोरात्र कष्ट करून जगातील सर्वात सुंदर असे राज्य घटना निर्माण केली हे त्यांचे कार्य प्रेरणादायक आहे असे मत व्यक्त केले . जगातील सर्वात मोठे हास्त लिखीत संविधान हे भारतीय राज्य घटनेचे वैशिष्ट्ये आहे. तसेच जगातील सर्वात मोठी व समृद्ध लोकशाही ही संविधानाची देणे आहे असे मत मांडले . यावेळी पत्रकार श्री सुधाकर बोराटे यांनी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विदयार्थी , शिक्षिक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कसबे तानाजी व आभार प्रदर्शन प्रा .श्याम सातर्ले यांनी केले .