Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे फळबागांचे झाले पंचनामे..

नुकसान भरपाई लवकर मिळावी हीच शेतकऱ्यांची अपेक्षा..

0 3 9 0 6 5

गुंडेगाव येथे फळबागांचे झाले पंचनामे..

नुकसान भरपाई लवकर मिळावी हीच शेतकऱ्यांची अपेक्षा..

वाळकी प्रतिनिधी :- नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून वादळी वारा व सततच्या अवकाळी पावसामुळे फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत नुकतेच तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, मंडल कृषी अधिकारी नारायण कारंडे, कृषी पर्यवेक्षक संजय बोरुडे, तलाठी पांडुरंग कोतकर यांनी पाहुणी करुन पंचनामे केले.
मे महिन्याच्या सुरुवातीपासून पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात फायदा जरी झाला असला तरी कांदा उत्पादक तसेच फळबाग शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
परिसरात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक तसेच फळबागा आहेत. परंतु मंगळवारी २० मे रोजी झालेल्या वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने फळझाडे उनमळुन पडले तसेच आंबा,डाळींब,तसेच शेतामध्ये उघड्यावर साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस उघडून कांदा थोडा सुकेल या आशेने शेतकरी निवांत होता परंतु या पावसामुळे शेतात उघड्यावर ठेवलेला कांदा अक्षरशः सडण्याचा स्थितीत गेला आहे. दुष्काळात जगवलेला कांदा फेकून देण्याची वेळ आल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.तर काही ठिकाणी डाळींबाचे झाडे उखडून फळांचा अक्षरशः सडा पडला आहे.तर यामुळे गुंडेगाव भागातील गावांमधील कांदा फळबागा उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
यावेळी रामदास भापकर, नारायण भापकर,ग्रामपंचायत सदस्य सुनिल भापकर,रगंनाथ भापकर (अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष भारतीय कृषक समाज),तबाजी हराळ,गोपाल बैरागी,नागेश भापकर आदी शेतकऱ्यांनी वादळी वाऱ्यासह झालेल्या नुकसानीचे पंचनामे केलेले असून नुकसान भरपाई लवकर द्यावी.अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

गुंडेगाव येथे फळबागा शेतकरी यांच्या शेतात समक्ष जाऊन पाहणी केली असता फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.त्याप्रमाणे पंचनामा केलेला आहे.जेवढे लवकर होईल तेवढी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करु, तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ही काही नुकसान भरपाई देता येईल का याबाबत चौकशी करून पुढील कार्यवाही करु. – – – –  विकास पाटील (तालुका कृषी अधिकारी)

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अक्षरशः आमच्या डाळींब बागांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे.सोसायटी,खाजगी बँका यांच्या कडून लाखो रुपये कर्ज घेऊन बागांचे संरक्षण करण्यासाठी खर्च केला आहे.परंतु या पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. – – – – रामदास भापकर (गुंडेगाव शेतकरी)

आज कृषी अधिकारी यांच्या बरोबर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याची पाहणी केली आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सदर पंचनामे करून शासनाच्यावतीने होईल तेवढी मदत शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे.. – – – –पांडुरंग कोतकर (तलाठी गु़ंडेगाव)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे