Breaking
ब्रेकिंग

रायगड जिल्ह्यात काँग्रेसची झालेली वाताहात

0 3 9 0 2 7

प्रतिनिधी :राजेश बाष्टे

(लेखक – बळवंत वालेकर)

सध्या सर्वत्र विधानसभा निवडाणुकीची धामधूम सुरू आहे. २० नोव्हेंबरला मातदान तर २३ नोव्हेंबरला निकाल आहे. महायुती विरूध्द महाविकासआघाडी असा सामना चालू आहे ही निवडणूक महा अटीतटीची आहे . .भा. ज. प. , शिवसेना (एकनाथ शि़दे गट) , व राष्ट्रवादी (अजित पवार गट)यांची महायुती तर काँग्रेस , शिवसेना (उ. बा. ठा. ) आणि शरद पवार (राष्ट्रवादी) ) पक्ष आणि शे. का. प, यांची महाविकास आघाडी आहे . या दोन गटात ही कांटेकी टक्कर होईल. दोनही गटात जागा वाटप झालेआहे. रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघ आहेत . पक्षोपपक्षात बंडखोरही नशीब अजमावत आहेत . प्रत्येक पक्षाला महायुती व महाविकास आघाडीकडून जागा (प्रतिनिधित्व ) दिल्या गेल्या आहेत . पण राष्ट्रीय पक्ष असलेल्या *काँग्रेसला* महाआघाडीकडून एकही जागा दिली गेली नाही , हे शल्य आहे ., *
पूर्वाश्रमीच्या कुलाबा* जिल्ह्यातून अनेक स्वातंत्र्य सै निक तयार झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीबरोबर काँग्रेसही जिल्ह्यात बळकट केली. स्वातंत्र्य काळात हीच काँग्रेस मजबूत करण्याचे काम नानासाहेब कुँटे , भाऊसाहेब लेले , बाबासाहेब लिमये (अलिबाग) , भाऊसाहेब नेने (पेण) , आबासाहेब पन्हाळै व नानासाहेब बेडेकर (पनवेल) न. प. ठोसर (कर्जत) गोविंदराव लिमये (पाली) डाँ.करमरकर (महाड) काकासाहेब जोशी (श्रीवर्धन ) भास्करराव दिघे
(मुरुड) इ. नी केले . म्हणून १९५२ साली झालेल्या विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत कुलाबा जिल्ह्यात सात पैकी सात जागी काँग्रेस उमेदवार विजयी झाले. हा विक्रमच होय. त्यात अलिबाग येथून नानासाहेब कुँटे यांचा समावेश होता . याच नानासाहेबांना मुंबई राज्याच्या पहिल्या विधानसभेच्या सभापतीपदाची संधी मिळाली . त्याच काळात झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत *कुलाबा* मतदारसंघातुन काँग्रेसतर्फे विद्वद्रत्न
*डाँ. सी. डी. देशमुख* विजयी झाले. रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नरपद भूषविणा-या *सी. डी.* ना नेहरू मंत्रीमँडळातअर्थमंत्रीपद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या घटनेचा रोह्यासह सर्वांना आनंद झाला. पण याच चिँतामणरावाँनी मुंबईसह महाराष्ट्र होण्यासाठी आपल्या मःत्रीपदाचा त्याग केला.*डाँ. सी. डी* नी * मंत्रीपदाचा त्याग केल्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी वातावरण तयार झाले.त्याच काळात १९५७ च्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले . सत्ताधारी काँग्रेस पक्षाविरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्रित येऊन विधान सभा लढविली. परिणामी महाराष्ट्रात कांँग्रेसचे *पानिपत* झाले . म्हणून काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा पँतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे डोळे उघडले. .महाराष्ट्रात काँग्रेसला उभारी येण्यासाठी त्यांनी *महाराष्ट्र* राज्या निर्मितीस हिरवाकंदिल दाखविला. म्हणून *१मे १९६०* ला मुंबईसह महाराष्ट्र राज्य स्थापन झाले .यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले . या आनंददायी घटनेमुळे महाराष्ट्रात काँग्रेसने उभारी घेतली . परिणामी १९६२ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे पानिपत झाले . *”कुलाबा”* (विद्यमान रायगड ) जिल्ह्यात जिल्हा लोकल बोर्ड व जिल्हा परिषदेत काँग्रेसच दीर्घकाळ सत्तेत होती .
*आपल्या* जिल्ह्यात १९५२ सालापासून काँग्रेस व शे. का. प. हे दोनच पक्ष प्रबळ होते . पूर्वीचा *कुलाबा जिल्हा लोकल बोर्ड त्यानंतर आलैली जिल्हा परिषद आणि खासदारकीच्या निवडणुकीत काँग्रेस व शे. का, प. ला विजयश्री आलटून पालटून माळ घालत असे.ही प्रथा बँ. ए. आर्. अंतुले यांनी खासदारकीची *हंट्ट्रिक* करून मोडीत काढली .
भारताचे पहिले अर्थमंत्री डाँ. सी. डी. देशमुख , मुंबई राज्य विधानसभेचे पहिले *स्पीकर* नानासाहेब कुंटे , मुंबई विधानपरिषदेचे *उपाध्यक्ष* बाबासाहेब लिमये. , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बँ. अ़तुले , राज्यमंत्री दत्ताजी खानविलकर , बी. एल्. पाटील , रविंद्र राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री तथा विद्यमान खासदार सुनिल तटकरे., विद्यमान राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड काँग्रेस वेगळ्या उंचीवर नेली होती . . ( राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांतील राजकीय वैमनस्य पूर्वी व्हते. अ लिकडे ते वाढले आहे. असो. )
*महेंद्र घरत* यांच्या नेत्रुत्वाखालील जिल्हा काँग्रेसला विधानसभेच्या ७ एकही जागा (आमदार ) निवडण्याची संःधी महाविकास आघाडीने देऊ नये हे महान शल्य आहे. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
( हा लेख राजकीय नसून ऐतिहासिक माहिती पुरविणारा आहे.)

5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे