*अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांची मिळकतखार भरावस्थळी भेट देऊन पाहणी*
*अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांची मिळकतखार भरावस्थळी भेट देऊन पाहणी*
प्रतिनिधी: राजेश बाष्टे
अलिबाग: दि. १८/ अनधिकृत भराव प्रकरणी अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी आज मिळकतखार बागदांडा येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत पहाणी केली. त्यांचेसोबत तक्रारदार शेतकरी जगदीश म्हात्रे, विनय कडवे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रकरण काय?
वेळ पडल्यास मिळकतखार अनधिकृत भराव शासन काढायला लावेल असे वक्तव्य अलिबागचे प्रांत अधिकारी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत व मिळकतखार ग्रामस्थांशी चर्चा करताना केले होते, पण वारंवार तक्रारी करूनही काहीच ठोस कारवाई झाली नाही.
माती माफियांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनीकर्म विभागाचे बोगस पासेस तयार करून हा बेसुमार अनधिकृत भराव केला. बोगस पासेस तयार केलेत हे जिल्हाधिकारी कार्यालयाने मान्य केले व गुन्हे दाखल करण्याचे आदेश केले. पण चार महिने होत आले तरी बोगस पासेस तयार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत. आता या भरावामुळे शेतक-यांच्या शेतात पावसाचे पाणी तुंबले आहे. भरावामुळे आजूबाजूच्या गावामध्ये पाणीच पाणी होणार ही भिती खरी ठरली आहे. ग्रामस्थांनी स्वखर्चाने जेसीबी लाऊन भरावामुळे अडलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला आहे. भराव वेळ पडल्यास शासन काढायला लावेल अशी शेखी मिरवणारे अलिबागचे एस.डी. ओ. उर्फ प्रांत अधिकारी आता कुठे आहेत असा सवाल सामाजिक कार्यकर्ते संजय गंगाराम सावंत व मिळकतखार ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला होता. त्यानुसार अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी आज मिळकतखार बागदांडा येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत पहाणी केली.
तहसीलदार विक्रम पाटील यांनी त्यांचे सोबत उपस्थित मंडळ अधिकारी व तलाठी यांना योग्य त्या सूचना केल्या व ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केली.