महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.आ. रुपेश म्हात्रे तर प्रदेश उपाध्यक्षपदी राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वास आरोटे

महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यासच्या प्रदेशाध्यक्षपदी मा.आ. रुपेश म्हात्रे तर प्रदेश उपाध्यक्षपदी राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वास आरोटे
राहुरी तालुका जावेद शेख
महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यास या संस्थेच्या प्रांतिक अध्यक्षपदी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर प्रदेश उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वास आरोटे यांची निवड करण्यात आली.
तसेच याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी स्वप्निल भोईर, प्रदेश संपर्कप्रमुखयोगेश बेनके, प्रदेश प्रवक्ता संजीवन म्हात्रे, प्रदेश कार्याध्यक्ष नारायण मामा पाटील, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डाॅ.किशोर बळीराम पाटील, प्रदेश अध्यक्ष शिक्षक सेना सुधीर जावळे, उत्तर म. सचिव संजय फुलसुंदर, उत्तर म. प्रदेश संपर्कप्रमुख डाॅ.मनिलाल रतिलाल शिंपी, प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष शंकर खारीक, ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, ठाणे जिल्हा सचिव आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष शिक्षक सेना विलास भोईर, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवळीकर, नाशिक जिल्हा अध्यक्ष मूलचंद भगत, बीड जिल्हा अध्यक्ष फारुख भाई शेख, धुळे जिल्हा अध्यक्ष समाधान पाटील
ठाणे जिल्हा अध्यक्षा ( महिला आघाडी) नलिनी चौधरी, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष अजित गायधनी, महिला आघाडी समाज कल्याण न्यास जिल्हा अध्यक्ष सौ गायत्री महिंद्र पगार, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र बळीराम काबाडी, ठाणे महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड शुभांगी ताई निचिते, भिवंडी शहर जिल्हाध्यक्ष सौ स्वाती कांबळे, पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाश देवळीकर, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ नलिनीताई घरत, पालघर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ अंजलीताई चौधरी आदींची राज्यातील जम्बो कार्यकारणी जाहीर करून पदाधिकाऱ्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. नुकतीच शिर्डी येथे समाज कल्याण या संस्थेची 24 वार्षिक सर्वसाधारण सभा व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हास्य प्रबोधनकार तथा समाज कल्याण न्यास संस्थेचे प्रवक्ते संजीवन म्हात्रे होते. तर व्यासपीठावर समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक तथा थोर धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी आपल्या भाषणात पदे घेऊन ते पदे लग्न पत्रिका व विविध कार्यक्रमांच्या नावासाठी वापर करू नका समाज कल्याण या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्तानात सामाजिक कार्याचा वेलु गगनावर गेला आहे या संस्थेच्या माध्यमातून 365 दिवस समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून हा उपक्रम गेल्या 24 वर्षापासून सुरू आहे. दरवर्षी समाज कल्याण या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य दिपवाळीनिमित्त मिठाई, साडी तसेच आदिवासी भागामध्ये प्रत्येक वर्षी नवीन ॲम्बुलन्स, आरोग्य शिबिर, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा महोत्सव आयोजन केले जात असते. धर्मसेवक डॉ. सोन्या पाटील यांनी समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी माणसे कमवली. आज स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक जण पैशाच्या पाठीमागे पळतो पण हा माणूस माणसे कमवण्याच्या पाठीमागे पळतो मला काहीच नको जे व्यासपीठ आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्या व्यासपीठाच्या माध्यमातून समाजसेवा करत असताना आपण या संस्थेचे एक पाईक आहात या संस्थेच्या माध्यमातून आपली ओळख आपल्या समाज कल्याण या संस्थेची ओळख ही संस्था मातृसंस्था असून या संस्थेच्या माध्यमातून कोणालाही राजकारण करायचे नाही कोणतेही पदे मिळवायची नाही. राजकारणासाठी या संस्थेचा वापर आजपर्यंत आम्ही केला नाही. या संस्थेच्या कार्याचा आदर्श संपूर्ण हिंदुस्थानाला परिचित आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्याला काम करण्याची संधी मिळते तो त्याच्या जीवनामध्ये आपण एक चांगल्या परमार्थामध्ये काम करत असल्याचा आनंद मिळत असतो सर्वांनी हा आपला एक परिवार आहे आपल्या परिवारामध्ये कोणावरही संकट ओढवले तर ते सर्वांनी एकत्रित येऊन त्याच्यावर मात करण्यासाठी या संस्थेची खरी निर्मिती केली आहे या संस्थेमध्ये आमदार खासदार नगरसेवक सरपंच या सर्वांना संधी दिली जाते त्यांनी देखील पदाच्या माध्यमातून नक्कीच सोने केले आहे ही संस्था प्रत्येकाला विचार पुढे नेणारी मातृसंस्था आहे गेल्या 24 वर्षांपासून भिवंडी ते शिर्डी पायी पालखी जात असते यामध्ये हजारो भक्तगण सामील होतात हा एक साईबाबांचा संदेश प्रत्येकाच्या मनामध्ये देण्यामध्ये या संस्थेचा मोठा वाटा राहिला आहे कोणत्याही प्रकारची देणगी न घेता स्वयंस्फूर्तीने धर्म सेवक डॉक्टर सोन्या पाटील यांनी जगाला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणारी ही संस्था असून सबका मालिक एक है हा विचार प्रत्येकाने मनी रुजवला आहे 24 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या संस्थेने सोन्यासारखी कोट्यावधी लोकांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे या संस्थेच्या माध्यमातून माणसातील माणूसपण जागा करण्याचा खरा संकल्प दिला जात आहे तूज आहे रे तुझं पाशी तू जागा चुकलासी या उक्तीप्रमाणे नुकतीच शिर्डी येथे साई पालखी निवारा येथे या संस्थेचा 24 वा वर्धापन दिन व पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी नियुक्ती सोहळा संपन्न झाला यावेळी भिवंडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेश म्हात्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली त्यांच्या निवडीने नक्कीच नवचैतन्य प्राप्त झाली असून अनेक वर्षांपासून त्यांनी या संस्थेचे कामकाज पाहिले असून या संस्थेने दिपवाळी काळामध्ये प्रथम गोरगरिबाची दिवाळी मग आपली दिवाळी हा संकल्प गेल्या 24 वर्षापासून साकारला आहे यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वास आरोटे यांनी बोलताना सांगितले… समाज कल्याण हे प्रत्येक कार्यकर्त्याला काम करणारी मातृसंस्था असून दुसऱ्याच्या तव्यावर आपली पोळी भाजून घेता प्रत्येकाने मिळालेल्या संधीचे सोने करावे आपले विभागांमध्ये सामाजिक कार्यातून या संस्थेची ओळख निर्माण करावी या संस्थेचा मुख्य हेतू शैक्षणिक साहित्य दिपवाळी निमित्ताने साहित्य ॲम्बुलन्स शैक्षणिक साहित्य. वितरण केले जात आहे… यावेळी अहवाल सालामध्ये मृत्यू पावलेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली… कार्यक्रमाची सुरुवात साईबाबांची आरती होऊन दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली होती राज्यभरातून हजारो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार प्रदर्शन या संस्थेचे प्रवर्तक जेके पाटील यांनी केले शेवटी स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली…… समाज कल्याण या संस्थेचे संस्थापक धर्म सेवक सोन्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना हार तुरे हे अनाटाई खर्चाला फाटा देऊन सर्वांनी एक पेन एक वही जरी विद्यार्थ्याला देऊन दरवर्षी वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रत्येकाने माझ्याकडे येण्यापेक्षा आपल्या मतदारसंघांमध्ये सामाजिक उपक्रम घेऊन गोरगरिबांना जेवण साहित्य वितरण करण्याचा संकल्प यावेळी धर्म सेवक सोन्या पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी दीपक पाटील, गजानन पाटील, साजन भगत, सौ. रजिता दुपारे, विनया कदम, गायत्री पगार, शोभा थोरात, अश्विनी माने, सुनंदा निंबाळकर, कविता सरोदे, ज्योती गोडसे, सिंधूताई पगार, रत्न महाले, सहदेव जाधव, शिल्पा देह्कर, सीमा निचित, रोहिणी फरडे, गायत्री फरडे, वनिता कुरकुटे यासंह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.