वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान ; बाजरी, मका आणि दादर गव्हाच्या पिकांची अतोनात हानी

वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान ; बाजरी, मका आणि दादर गव्हाच्या पिकांची अतोनात हानी
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :तालुक्यातील पिंपळे परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः बाजरी, मका, दादरआणि गव्हाच्या पिकांवर या वाऱ्याचा मोठा परिणाम झाला असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला आहे. त्यातच अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी पिके आडवी पडली असून, काही ठिकाणी तुटून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळण्यास मोठा फटका बसणार आहे.काही ठिकाणी संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे. बाजरीच्या कणसांवरही परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता.
या गावांना वादळाचा फटका –
पिंपळे बु., पिंपळे खु., शिरसाळे, आटाळे,वाघोदा, निसर्डी, खडके, आदी गावात सोसाट्याचा वारा वाहत होता.