ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळणारा चित्रपट भटक्या भिंती- सुनील दातीर
भटक्या व ऊसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती उद्घाटन अकोल्यात संपन्न

ग्रामीण भागातील कलाकारांना वाव मिळणारा चित्रपट भटक्या भिंती- सुनील दातीर
भटक्या व ऊसतोड कामगारांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्मिती उद्घाटन अकोल्यात संपन्न
राहुरी अहमदनगर वृत्तसेवा / जावेद शेख
अकोले येथे ‘आरीबाडा मोशन पिक्चर’ निर्मित भटक्या भिंती या लघुपटाचे चित्रीकरण अकोले,अहिल्यानगर येथे नुकतेच पूर्ण झाले राज्यातील आणि तालुक्यातील ऊसतोड कामगार कुटुंबातील मुलगा आणि बाप यांच्या नाजूक नात्यावर आधारित लघुपट आहे भटके कामगार कुटुंब त्यांचे जनावरे, मुलांचे उघड्यावरचे भविष्य आणि अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी होणारा संघर्ष हा गहण व नाजूक विषयावर आधारित लघुपट आहे या लघुपटामुळे ग्रामीण भागातील कलाकार, निर्माता यांना नक्कीच वाव मिळून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची संधी मिळणार आहे असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि. सुनील दातीर यांनी केले. धुलीवंदनाच्या शुभमुहूर्तावर कार्यक्रमाचे उद्घाटन, लघुपटाची शूटिंग फर्स्ट क्लब अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातील,अकोले नगरपंचायत उपनगराध्यक्ष शरदराव नवले,धुमाळवाडी गावचे माजी सरपंच वसंत धुमाळ, शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष महेश पाडेकर, शिक्षक नेते राजेंद्र गवांदे, किशोर धुमाळ, बाळासाहेब बंगाळ, लिंगेश्वर आदर्श विद्यालय लिंगदेव शाळेचे मुख्याद्यपक गोपीनाथ हाडवळे,यांच्या हस्ते झाले.
“भटक्या भिंती” लघुपटाचे लेखक-दिग्दर्शक श्री. सचिन विठ्ठल हाळकुंडे’, कार्यकारी निर्माते श्री.रामभाऊ बेणके, क्रिएटिव डायरेक्टर श्री.के.भारत, सिनेमॅटोग्राफर श्री.संचित साळवे, प्रमुख कलाकार श्री.स्वप्नील कांडेकर,साक्षी पवार मोनिका पन्हाळे, रामभाऊ बेणके, रुचिरा देसाई, अर्जुन होलगिर, धनंजय हाळकुंडे आणि रुद्रा हाळकुंडे, तसेच प्रॉडक्शन मॅनेजर श्री.मयूरेश नांद्रेकर’ लाइन प्रोड्यूसर ‘काजल नांद्रेकर’ पूर्ण टीम चा उत्साह आणि आत्मविश्वास वाढविला.
लेखक-दिग्दर्शक सचिन विठ्ठल हाळकुंडे यांनी ‘भटक्या भिंती’ ह्या ग्रामीण विषयाला अस्सल ग्रामीण पणा यावा ह्या साठी प्रामुख्याने आकोल्यातील ग्रामीण कलाकारांना च प्राधान्य देऊन उसतोड कामगार आणि त्यांचे खडतर जीवन जसेच्या तसे कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, “उसतोड कामगार आणि त्यांचे खडतर जीवन अशा अवघड विषयावर ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन लघुपटप बनवणे हा एक मोठा टास्क होता पण माझ्या पूर्ण टीम च्या सहकार्याने तो पूर्णत्वास आला. हा विषय तालुका अकोले च्या वतीने राज्यस्तरीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीच्या स्तरावर वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल च्या माध्यमातून जावा हाच माझा आणि माझ्या टीम चा प्रयत्न राहील असंही ते म्हणाले.