मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रात समावेश करून, कायमस्वरूपी पाणी आणणार:- प्रा. रामदास झोळसर
मांगी तलावाचा कुकडी लाभ क्षेत्रात समावेश करून, कायमस्वरूपी पाणी आणणार:- प्रा. रामदास झोळसर
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १४/ करमाळा तालुक्यातील पोत्रे येथे प्रा. रामदास झोळ सर यांची जाहीर सभा झाली. पोत्रे गावातील ग्रामस्थांनी या सभेला उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रा. रामदास झोळ सर यांना पोथरे येथील जाहीर सभेत जाहीर पाठिंबा दिला असुन शेतकरी, वंचित, कष्टकरी सर्व समाजाला न्याय देणारे, विकासाची दृष्टी असलेले, रामदास झोळ सर यांना निवडून देण्याचे आवाहनही यावेळी साहेबराव वाघमारे त्यांनी केले.
यावेळी बोलताना प्रा. झोळसर म्हणाले मांगी तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश करून कुकडीचे पाणी कायमस्वरूपी आणण्यासाठी तसेच रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी, अशा सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ मतदानरुपी आशीर्वाद द्या, असे मत प्रा. रामदास झोळ सर यांनी व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे, आदिनाथचे मा. संचालक लालासाहेब जगताप, काँग्रेसचे जिल्हा संघटक हरीभाऊ मंगवडे, वंचितचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे, ओबीसी तालुका अध्यक्ष गफूर शेख, तालुका उपाध्यक्ष आनंद झोळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, जिल्हा युवा नेते गणेश मंगवडे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, राजुरीचे मा. सरपंच निवृत्ती साखरे, अनिरुद्ध झोळ, श्रीकांत साखरे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रा. रामदास झोळ सर म्हणाले की, कुकडीचे हक्काचे पाणी कर्जत तालुक्यातील गावांना सोडण्यात येते. हेच पाणी उजव्या कालव्याद्वारे मांगी तलावात सोडल्यास या तलावा खालील मांगी , वीट, मोरवड, पिंपळवाडी, झरे, पुनवर, वडगाव, रावगाव, वंजारवाडी , जातेगाव, हिवरवाडी, भोसे, या गावातील पाझर तलावातुन पोथरे, बिटरगाव, निलज, धायखिंडी, खांबेवाडी, करंजे, भालेवाडी, या गावांना मांगी तलावातुन पाणी पुरवठा होऊन, येथील शेतकरी समृद्ध होऊ शकतो. पाणी प्रश्न बरोबर शिक्षणासाठी देवळाली येथे शैक्षणिक संकुल उभा करणार आहे. तसेच आरोग्याबाबतही करमाळा तालुका मागास असून, सर्व सोयीनिमित्त मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा मानस आहे. रोजगार निर्मितीसाठी एमआयडीसी चे काम मार्गी लावून येथे विविध उद्योग आणून आपण युवकांना रोजगार मिळवून देणार आहे. आतापर्यंत करमाळा शहरात रोजगार मेळाव्याच्या माध्यमातूनही आपण ५०० तरुणांना रोजगार मिळवून दिला आहे. मराठा समाज बरोबर ओबीसी धनगर बहुजन समाज बांधवांना शैक्षणिक सवलती मिळवून दिलेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव, शेतकऱ्याची कारखान्याकडे अडकलेली बिले यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ अण्णा कांबळे यांच्या बरोबर आंदोलन करून मिळवून काम केले आहे. मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा सुपुत्र असल्यामुळे मला सर्वसामान्य लोकांचे प्रश्न माहित आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्याचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर गटातटाच्या, जातीपातीच्या राजकारणात न अडकता एक वेळ मला निवडून द्या. मी नक्कीच करमाळा तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून विकास करून दाखवेन, असे मत प्रा. रामदास झोळसर यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ आण्णा कांबळे यांनी राजकारणाचा लेखा जोखा मांडत म्हणाले की, येथील पुढारी सोयीचे राजकारण करत असून, आपसात सत्तेची वाटणी करून, आपल्या पुढील पिढीचे भवितव्य उज्वल करण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांना तुमच्या मुला बाळाची चिंता नाही पण त्यांना भीती आहे की, हे जर शिकले तर आपल्या मागे कोण येणार? हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहकार्य करणारा प्रा. रामदास झोळ सर एकमेव असे व्यक्ती आहेत की, त्यांनी निवडणुकीच्या आधी पासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले, त्यावेळेस पासून ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत. सत्तेत असताना आरक्षणाची स्पष्ट भूमिका न घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. सरांनी शैक्षणिक समानतेच्या धोरणावर मराठा, ओबीसी, धनगर, बहुजन समाजाला त्यांनी न्याय मिळवून दिला आहे. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांच्या माध्यमातून धनगर समाजाला एसटी समाजाप्रमाणे शैक्षणिक सवलती या माणसाने मिळवून दिल्या आहेत. ०८ जीआर शासनाकडून काढून घेऊन मुलींना मोफत शिक्षणाचा जीआर काढण्याचे काम यांनी केले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणचा प्रश्न मार्गी लावायचा असेल व सर्व समाजाला शैक्षणिक सवलती मिळून देण्यासाठी झोळ सर यांना पाठबळ देणे गरजेचे आहे.
कै. नामदेवराव जगताप यांच्यानंतर एकही शैक्षणिक संस्था कुणी उभी केली नाही. त्यामुळे आता गट तटाचे राजकारणात भावनिक बोलण्याला बळी पडू नका. ज्यांनी आपल्या तालुक्याचे वाटोळे केले त्यांना आता त्यांची जागा दाखवून करमाळा तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य रोजगार निर्मिती करण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू प्रामाणिक नेतृत्व असणाऱ्या प्रा. रामदास झोळ सर यांना रिक्षाचे बटन दाबून विजयी करा. ही *रिक्षा* तुम्हाला अडीअडचणीतुन बाहेर काढून करमाळा तालुक्याचा विकास करणार असा विश्वास दसरत अण्णा कांबळे त्यांनी व्यक्त केला आहे.
या सभेसाठी संतोष वाळुंजकर, अशोक जाधव, काशीम शिंदे, तुकाराम खाटमोडे, बाळासाहेब ठोंबरे, विजय झिंजाडे, राज झिंजाडे, प्रा. आजिनाथ झिंगाडे सर, रमेश आमटे, मारुती लाडाने, विजय शिंदे, दादा शिंदे, जुबेर शेख, संतोष मोरे, रमेश आमटे, गणेश खाटमोडे, परशुराम खाटमोडे, हर्षद खाटमोडे, अंकुश तळेकर, काका पाडुळे, भाऊसाहेब झिंजाडे, महादेव शिंदे, राजू खाटमोडे यांच्यासह शेतकरी, युवक, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोथरे येथील जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जनतेने आता ही निवडणूक हातात घेतली असून प्राध्यापक रामदास झोळ सर यांच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी असल्याचे या सभेमध्ये झालेल्या गर्दीमुळे दिसून आले. पोथरे येथील सभेचे प्रास्ताविक सूत्रसंचालन श्रीकांत साखरे-पाटील यांनी केले तर आभार गोपीनाथ पाटील यांनी मानले.