स्नेहबंध’ तर्फे रेणुका माता पायी दिंडीचे स्वागत

‘स्नेहबंध’ तर्फे रेणुका माता पायी दिंडीचे स्वागत
तुझा पाहूणी सोहळा, माझा रंगला अभंग
गेला शिणवटा सारा, मेघ झाले पांडूरंग
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर – सनई चौघडे आणि टाळ-मृदंगाचा गजर, राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो वारकरी, त्यांच्या हातात असलेले भगवे ध्वज, मुखी विठू नामाचा गजर अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री क्षेत्र मानोरी पालखीचे रविवारी सकाळी शहरातून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या पालखी सोहळ्याचे स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी स्वागत केले. रेणुका माता पायी दिंडी सोहळा, श्री क्षेत्र मानोरी पालखी जवळपास ४८० किलोमीटरचा दिवसांचा प्रवास करत पांडुरंगाच्या भेटीसाठी पालखीसोबत वारकरी बांधव पंढरपूरमध्ये पोहोचतील. या संपूर्ण २८ दिवसांच्या प्रवासात अनेक अध्यात्मिक कार्यक्रमांसह गोल रिंगण आणि उभे रिंगण देखील पार पडत आहेत. दिंडी सोहळ्यात असंख्य वारकरी सहभागी झाले आहेत .