ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
प्रतिनिधी :- पंकज पाटील
चोपडा :- चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित डॉ. दादासाहेब सुरेश जी. पाटील महाविद्यालयातील उप प्राचार्य डाॅ. ए. बी. सूर्यवंशी, शाळा समन्वयक डॉ. दीनानाथ पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका ममता न्याती आणि पालक शिक्षक संघाचे सदस्य विशाखा देसले, चंद्रकांत देवरे, प्रशांत पाटील, गणेश पाटील, पटले सर, कोमल वानखेडे, योगेश कुलकर्णी, प्रफुल्ल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शाळेतील संगीत शिक्षिका अश्विनी ढबू यांनी ईशस्तवन सादर केले. उपस्थितांच्या स्वागतासाठी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थीनी अनम झिशान सैय्यदआणि आरुषी दशरथ पाटील, इयत्ता सहावीचे विद्यार्थी नेहा समाधान पाटील आणि शिवराज नरेश देशमुख, इयत्ता सातवीचे विद्यार्थी जय गजानन पाटील आणि अन्वी सुधीर पाटील, इयत्ता आठवीचे विद्यार्थी वेद पवन अग्रवाल आणि श्रीजा प्रदीप लासुरकर हे विजयी झाले. .इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सामाजिक शास्त्रावर आधारित मॉडेल्स बनवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये भारतीय सण, उत्सव, भौगोलिक रूपे आणि पर्यावरण रक्षणाचे संदेश देणारे मॉडेल्स सादर करण्यात आले.
प्रथम क्रमांक जोयल मांगीलाल पाटील आणि स्वरा गुलाबसिंग पावरा, द्वितीय क्रमांक मानस सैंदाणे आणि देवांश योगेशकुमार खैरनार, तृतीय क्रमांक गार्गी कुमावत अदिती राजीव झा यांनी प्राप्त केला. विहान भूषण पाटील आणि देवांश राणे तसेच शौर्य शिरीष ठाकरे आणि राजवीर पारधी या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
इयत्ता चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. इयत्ता चौथीचे विद्यार्थी स्वरा अतुल देशमुख, विधि वसंत पाटील आणि जोयल मांगीलाल पाटील, इयत्ता पाचवी चे विद्यार्थी रिद्धी वैभव पाटील, श्रीनील निलेश पाटील, विधी जयकुमार माधवानी, विशाखा प्रमोद पाटील, इयत्ता सहावीचे विद्यार्थी समृद्धी राहुल बडगुजर, हीत मनेष देसले, नेहा समाधान पाटील, दीक्षा भरत गाडीलोहार, इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनी वैभवी सुधाकर बाविस्कर, गंगोत्री किरण साळी, इयत्ता आठवीच्या विद्यार्थीनी कोशिका अतुल शिंपी, वैष्णवी शिरसाठ, सानिका राजेंद्र महाजन आणि श्रीजा प्रदीप लासुरकर यांनी विशेष यश संपादन केले.
इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या वेशभूषा स्पर्धेमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी नानक जयकुमार मलानी, वल्लभ विनायक वैद्य, तनिष संदीप पाटील, अर्णव अनय देशपांडे, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी विधी रणधीर पाटील, आराध्या सचिन पाटील, तनझीम तनवीर पटेल, इयत्ता तिसरीचे विद्यार्थी अंशिका अविनाश जाधव, गौरेश पवन चौधरी, लवीन लालचंद पटले, पार्थ संदीप पाटील, राजवीर गितेश देशमुख हे विद्यार्थी विजयी झाले.
नवरात्रीनिमित्त इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिलीचे विद्यार्थी मनुश्री कैलास पाटील,
वेदांत सोनवणे, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी स्वरा दीनानाथ पाटील , तनष्क माळी इयत्ता तिसरीचे विद्यार्थी प्रिषा सुरेश पवार, सानिध्य सारस्वत, इयत्ता चौथीचे विद्यार्थी स्मित संदीप पाटील, गार्गी कुमावत, इयत्ता पाचवी चे विद्यार्थी विहान राठोड, रीत मलानी, खुशी बाहेती, इयत्ता सहावीचे विद्यार्थी मानवी गेही, चैतन्य शिरसाठ, इयत्ता सातवीचे विद्यार्थी स्वरा पाटकर, नैतिक पाटील, इयत्ता आठवीचे विद्यार्थी वेद अग्रवाल, पलक बाहेती, पुरंदरी करंदीकर, इयत्ता नववीचे विद्यार्थी यश सोनवणे, ध्रुवी संदीप पाटील आणि इयत्ता दहावीचे विद्यार्थी दिवेश खाचणे, लक्ष्मी महाजन, सृष्टी सैंदाणे हे विजयी झाले.
हिंदी दिनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रभाषा हिंदी बोध परीक्षेमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आरव जयकुमार माधवानी, नानक जयकुमार मगरमलानी, आराध्या शिरीष ठाकरे, मनुश्री कैलास पाटील,आरोही सोमनाथ कासव हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता दुसरीच्या गटात मोहम्मद खिजर अखिल शेख, आराध्या सचिन पाटील , गौतमी राकेश कोळी, तन्झिम तनवीर पटेल , पार्थ अभयकुमार मेहेर ,सार्थक भूषण पाटील हे विद्यार्थी विजय झाले.
इयत्ता तिसरीच्या गटात चार्मी प्रवीण पाटील, सार्थक शरद सावंत, सानिध्य सागर सारस्वत, हर्षवर्धन रोहिदास कोळी हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता चौथीच्या गटात मयंक शशांक पाटील,भैरवी प्रवीण पाटील, सृष्टी शरद खैरे हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता पाचवीच्या गटात लवकेश रामकृष्ण कोळी, हितार्थ गणेश साळुंखे, दिव्यांशू कैलास पाटील, गोपेश पंकज अग्रवाल,अनम झीशान असद सय्यद, रीत जयकुमार मंगरमलानी, विशाखा प्रमोद पाटील, खुशी अंकुश बाहेती, आदिती समाधान कोळी, जयेश गिरीश महाजन हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता सहावी साठी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये, नील विजय सोनवणे, मोक्षाली रविकांत मगरे, काव्यराज जितेंद्र पाटील, सिया अभयकुमार मेहर हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता सातवी साठी हिंदी सुलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेमध्ये जय गजानन पाटील, खुशल चंद्रकांत देवरे, सिद्धी चंद्रकांत पाटील, गंगोत्री किरण साळी हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता आठवीसाठी हिंदी सुलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत प्रांजल विनोद अहिरे, अनुष्का प्रशांत पाटील, श्रुति विनोद चौधरी, सोनाक्षी विशाल गेही हे विद्यार्थी विजयी झाले.
इयत्ता नववीसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत आयुष सुनिल सोनवणे, अनुष्का जितेंद्र सुर्वे, संस्कृति बापूसाहेब शिंदे, दक्ष प्रविण जैसवाल हे विद्यार्थी विजयी झाले.
दहावीसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेमध्ये
अनोशा झिशान सैय्यद, खुशीराज जगदीश जाधव, अनिरुद्ध महेंद्र धनगर, सुष्मिता अनिल शिरसाठ हे विद्यार्थी विजयी झाले.
राष्ट्रीय स्वरावर आयोजित करण्यात आलेल्या अबॅकसच्या स्पर्धेमध्ये अनम झिशान असत सैय्यद, समृद्धी बडगुजर, जयेश महाजन, नील विजय सोनवणे आणि हसनेन रेहान सैय्यद या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले. त्यासाठी त्यांना शाळेतील शिक्षिका प्राजक्ता सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
या पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका सुचिता पाटील आणि जयश्री सूर्यवंशी यांनी केले.
महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॕड. संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डाॅ. स्मिता पाटील, शाळा समन्वयक एन. एस. सोनवणे, प्रा. डाॅ. डी. एस. पाटील, अशोक साळुंखे, विलास दारूंटे, डी. जी. सोमानी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, अश्विनी खंडेराव पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
या पुरस्कार वितरण समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकार्य लाभले.