Breaking
ब्रेकिंग

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन?; विलास राऊत – पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना प्रश्न

0 3 9 0 3 7

कुठे गेले ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे आश्वासन?; विलास राऊत – पाटील यांचा आमदार नारायण पाटील यांना प्रश्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १६/ २०१९ ते २४ या मागील पंचवार्षिक मध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी प्रत्येक वर्षी सरासरी २०० ते २४० दिवस योजना चालवली. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या कार्यकाळात उन्हाळी आवर्तन हे प्रत्येक वर्षी १०० दिवसापेक्षा अधिक चाललेले आहे. २०२३ मध्ये दुष्काळ असताना उजनी धरण अवघे ६०% भरलेले होते त्यावेळेस संजयमामांनी रब्बी आवर्तन हे तब्बल ११६ दिवस चालवले. उजनी धरणावरील सर्वात प्रथम सुरू होणारी आणि सर्वात उशिरा बंद होणारी दहिगाव उपसा सिंचन ही योजना होती याची नोंद कार्यालयाकडे आहे. असे असतानाही २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस विद्यमान आमदारांनी ३६५ दिवस योजना चालवण्याचे आश्वासन मतदारांना दिले होते.

कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार उन्हाळी आवर्तन ५ मार्च २०२५ पासून सुरू झालेले आहे. उजनी धरणावरील सर्वच उपसा सिंचन योजना व कालवे हे ५ तारखेपासून सुरू झालेले आहेत. उजनी धरणात अवघा ४२ टक्के पाणीसाठा आहे. मार्च च्या तीव्र उन्हामुळे पिके पाणी अभावी जळू लागलेली आहेत असे असतानाही अद्याप दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू झालेली नाही. विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी ३६५ दिवस दहिगाव योजना चालवण्याचे दिलेले आश्वासन आता कुठे गेले असा प्रश्न घोटी गावचे लोकनियुक्त सरपंच तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विलास काका राऊत – पाटील यांनी विचारला आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये दहिगाव योजना चालवत असताना कृष्णा खोरे महामंडळ यांच्याकडून साडेपाच कोटी विज बिल भरणा करणे, वीज बिलाचा दर कमी करणे आणि अतिशय कठीण प्रसंगी ज्यावेळेस दहिगाव उपसा सिंचन योजनेचे कनेक्शन विज बिल न भरल्यामुळे कट केले होते त्यावेळेस संजयमामा शिंदे यांच्या विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव या कारखान्याने बिल भरण्याची हमी घेतल्यानंतर योजना सुरू झाली होती.यापैकी कोणता तरी पर्याय विद्यमान लोकप्रतिनिधींनी निवडायला पाहिजे अशी दहिगाव योजनेच्या २४ गावातील शेतकऱ्यांची रास्त अपेक्षा आहे.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 3 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे