विकसित कृषि संकल्प अभियान चे माध्यमातुन शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर*
*विकसित कृषि संकल्प अभियान चे माध्यमातुन शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर
प्रतिनिधी : प्रविण देशमुख
कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली द्वारा संपूर्ण भारत देशात केंद्रीय कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे मार्गदर्शनाखाली कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातून खरीप हंगाम पुर्व विकसित कृषि संकल्प अभियानाचे आयोजन दिनांक २९ मे ते १२ जून २०२५ दरम्यान करण्यात येत आहे. या अभियानाचा उद्देश गावोगावी जावून खरीप हंगामाच्या अनुषंगाने शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन चर्चा करणार आहेत, प्रयोगशील शेतक-यांच्या शेतावर भेटी, शासकीय योजना, आधुनिक कृषि तंत्रज्ञान विषयी जागरूकता मोहीम राबविणे हा आहे. या अभियानामध्ये भारतीय कृषि अनुसंधान परिषद चे राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, बारामती चे शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी चे शास्त्रज्ञ, केव्हीके चे शास्त्रज्ञ, आत्मा व कृषि विभाग अहमदनगर, महाराष्ट्र शासन चे अधिकारी तसेच गाव पातळीवर विविध विभागातील अधिकारी सहभागी होऊन शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने द्वारा कार्यक्षेत्रातील ७ तालुके जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, नगर, पाथर्डी, शेवगाव व नेवासा मधील एकूण ९० गावांमध्ये विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रत्येक गावांमध्ये कृषि रथ जाणार असून शास्त्रज्ञ व अधिकारी शेतक-यांना मार्गदर्शन करणार आहेत. या अभियानामध्ये जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभाग नोंदवून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाचा व शासकीय योजना विषयी माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र दहिगाव-ने चे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ श्याम सुंदर कौशिक यांच्या वतीने करण्यात येत आहे.